रत्नागिरी : करोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून विदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या ८५८ जणांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास रत्नागिरीचे चारशे खाटांचे जिल्हा रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
लॉकडाऊनचे पालन करा
आगामी काळात गरज पडल्यास येथील जिल्हा रुग्णालयाला कोरोना रुग्णालयात बदलण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र तशी वेळ येऊ नये, यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे. जिल्हा कोरोना रुग्णालयात रूपांतरित झाले, तर अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण रत्नागिरीतील खासगी रुग्णालयांकडे पाठविण्यात येतील. तेथे त्यांना जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच सेवा दिली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
रुग्णांची संख्या शून्यावर
दरम्यान, त्या' करोनामुक्त रुग्णाला पुर्णतपासणीनंतरच डीस्चार्ज मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण बरा झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता शून्यावर आली आहे. त्या रुग्णाला आणखी दोन दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याच्या तपासणीचे नमुने पुन्हा एकदा प्रयोगशाळेत पाठवून तो कोरोनामुक्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला घरी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.वेळ पडली तर सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णाची व्यवस्था खासगी रुग्णालयात करण्याबाबत विचार सुरु आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.