उद्योग क्षेत्रातील मंदी हटवण्यासाठी केंद्र घेणार दिलासा देणारा निर्णय

उद्योग क्षेत्रातील मंदी हटवण्यासाठी केंद्र घेणार दिलासा देणारा निर्णय

सावंतवाडी - जिल्ह्यामध्ये पर्यावरणपुरक, शेतीपुरक प्रदुषण निर्माण न करणारे उद्योग आणून येथील भुमीपुत्राला रोजगार मिळाला पाहीजे, यासाठी आपले प्रयत्न सुरु असुन उद्योग क्षेत्रात आलेली मंदी दुर करण्यासाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार असल्याची माहीती अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी दिली.

सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपत्तग्रस्त भागातील लोकांना मदत देण्यासाठी मंत्री अरविंद सावंत जिल्ह्यात आले होते. त्यांनी आज येथील मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतांनाच पत्रकार परिषद घेतली.

श्री. सावंत म्हणाले, केंद्राने उभारलेले उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे याठिकाणी उद्योग उभारताना रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. नव्याने कारखाने निर्माण करून त्यांना उभारी देण्याचा विचार केंद्र सरकारच्या मनात आहे. 

 उद्योग क्षेत्राच्या बाबतीत बॅंकांनी हात आकडता घेतला आहे. त्यामुळे विशेषतः अॅटो सेक्टरमध्ये मंदी आली आहे.  गाड्या खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. यासंदर्भात सरकार गंभीर असुन अॅटो सेक्टरला दिलासा देणारा निर्णय लवकरच घेतला जाणार  आहे.

- अरविंद सावंत

श्री. सावंत म्हणाले, कोकणातील पुरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे, मात्र मधल्या काळात त्यांना लागणारी मदत म्हणुन त्याच्यासाठी जीवनावश्यक साहीत्य पुरविण्यात येत आहे. माझ्याकडे आलेला विस्तापितांचा आकडा एक हजार पेक्षा जास्त आहे, मात्र राहत्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले त्यांनाही दिलासा देण्यासाठी मी कोल्हापूर तसेच कोकणाचा दौरा केला आहे. राज्य सरकारने विस्तापितांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी केली असुन त्याचा पाठपुरावा करणे माझे कर्तव्य असुन लवकरच ही मागणीही पुर्ण होणार आहे.

मंत्री केसरकर म्हणाले, येथील नुकसानग्रस्त लोकांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, शेती बरोबरच फळ बागायतदारांनाही नुकसान भरपाई देतांना योग्य निर्णय शासन घेणार आहे, तशी मागणी आपण केली असुन मातीच्या घरा संदर्भातही नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ओद्यौगिक वाटचालीस चालना
केंद्रीय अवघड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीस गती मिळेल त्याच बरोबर पुरग्रस्त्नाही दिलासा मिळणार अशी आशावाद मंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com