रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल व्यावसायिकाला खंडणीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न नागरिकांच्या स्मरणात असतानाच पुन्हा एकदा याच भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आठवडा बाजार येथील हॉटेल गणेशच्या मालकांना दोघांनी धमकी देत आठवड्याला पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'तुला व्यवसाय करायचा असेल तर आठवड्याला पाच हजारांची खंडणी दे, नाहीतर तू, तुझा भाऊ आणि तुझ्या कामगारांना सोडणार नाही. अशी धमकी देत शनिवारी आठवडा बाजार येथील हॉटेल गणेश मध्ये घुसले. खंडणी देण्यास विरोध केल्यावर शिवीगाळ जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याच बरोबर हॅाटेल मधील स्टाफला काम न करण्याची धमकी दिली. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी हॉटेल मालक ऋषिकेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिल्यानंतर शहर पोलीस स्थानकात मनोज तांडेल आणि आशु सावंत या दोघांवर भा. द. वि. कलम 387 नुसार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास शहर पोलीस करत आहेत.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.