आयलॉग पोर्ट प्रकल्प जनसुनावणीत गदारोळ

आयलॉग पोर्ट प्रकल्प जनसुनावणीत गदारोळ

राजापूर - आयलॉग पोर्ट कंपनीद्वारे उभारल्या जाणाऱ्या जेटी प्रकल्पाच्या जनसुनावणीवेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रकल्प रद्द करण्याची मागणी दोन-अडीच तास रेटून धरली. यातच आयलॉगकडून कंपनीसंबंधी माहितीही देण्यात आली. या गोंधळात जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींना म्हणणे मांडण्याची विनंती केली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने गोंधळातच जनसुनावणी संपल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले. 

तालुक्‍यातील आंबोळगड समुद्रकिनारी आयलॉग पोर्ट कंपनीद्वारे जेटी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासंबंधी पर्यावरणीय जनसुनावणी यापूर्वी विविध कारणांमुळे तीन वेळा रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा राजवाडी-तिवरे येथे जनसुनावणी आयोजित 
केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजवाडी-तिवरे येथे झालेल्या जनसुनावणीवेळी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, प्रांताधिकारी अभय करंगुटकर, तहसीलदार प्रतिभा वराळे आदी उपस्थित होते.  मच्छीमार बांधवांसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जनसुनावणीला सुरवात होताच ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजीस सुरवात केली. ‘आयलॉग रद्द झालाच पाहिजे, आयलॉग को फेक दो,’ अशी घोषणबाजी सुरू असतानाच आयलॉग कंपनीने प्रकल्पासंबंधीत माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना प्रकल्पासंबंधी म्हणणे मांडण्याची वारंवार विनंती केली. मात्र, नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. उलट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे यांनाही म्हणणे मांडण्याची विनंती केली. मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गोंधळातच जनसुनावणी संपल्याचे जाहीर केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com