महामार्गचाैपदरीकरण : शेजारी राहिले नाहीत, होत्याचे नव्हते झाले

महामार्गचाैपदरीकरण : शेजारी राहिले नाहीत, होत्याचे नव्हते झाले

रत्नागिरी - दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. महामार्ग रुंदीकरणाने आमच्या पोशिंद्यालाच हात घातला. काबाडकष्ट करून घरं-दुकाने बांधली. उदरनिर्वाहाचे हेच साधन चौपदरीकरणासाठी डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहतानाच्या यातना सहन होत नाहीत. पैसा, मोबदला मिळाला पण एका पिढीचे बाजारपेठेशी असलेले नाते संपले. शेजारी-शेजारी राहिले नाहीत, होत्याचे नव्हते झाले, अशा भावनिक भावना उद्‌ध्वस्त झालेल्या पाली बाजारपेठेतील व्यापारी शैलेश काटकर, प्रसन्न पाखरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

‘सकाळ’ने महामार्ग चौपदरीकरणामध्ये बाजारपेठा, गावातील बाधितांच्या समस्यांबाबत सर्वेक्षण केले. या वेळी बाधितांनी भावना व्यक्त केल्या. शैलेश काटकर, पाखरे म्हणाले, ‘‘पाली बाजारपेठेतून बायपास झाला असता, तर बाजारपेठ वाचली असती. काही लोकाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बायपास काढण्यात आला. कमी पैशात बाजारपेठेच्या मागून बायपास झाला असता. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरींना हा विषय पटला होता; मात्र बायपास रद्द करून बाजारपेठेतून चौपदरीकरणाचे काम निश्‍चित केले. यामध्ये किती घरांचे नुकसान झाले, किती दुकाने जमीनदोस्त झाली, हे सांगू शकत नाही. ७५ ते ८० कुटुंब प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रस्त्यावर आले.

व्यवसायाला मोठा फटका बसला. दोन्ही गोष्टींचा मेळ घातला पाहिजे होता. काही जणांना रुंदीकरण आपत्ती बनली, तर काहींना इष्टापत्ती बनली. लहान व्यावसायिकांना जागा नाही उरली. रस्त्यावर आता व्यवसाय करणे शक्‍य नाही. आमचे मोठे नुकसान झाले नाही; परंतु बाजारपेठेत विस्कळीतपणा आला. ग्राहकांवर परिणाम झाला. तीन महिने व्यवसाय बंद राहिले. आता यापुढच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बिगरशेती जागेत इमारती उभ्या केल्या. त्यांना परवानगी मिळत नाही. ग्रामपंचायत अनधिकृत बांधकाम म्हणून जादा दर आकारून कर वसूल करीत आहे. २५ टक्के व्यवसाय घटला आहे. १० टक्के व्यवसाय थांबविला. बदलाचे वारे वाहतेच, पण बाजारपेठेत लोक जवळ होते. शेजारी-शेजारीही होते. बाजारपेठ उठली आणि आता होत्याचे नव्हते झाले. शेजारी, ग्राहक लांब गेले. कुटुंबावर परिणाम झाला. अनेकांनी दुकान बंद केली.’’

बिगरशेती जागेत इमारती उभ्या केल्या. त्यांना परवानगी मिळत नाही. ग्रामपंचायत अनधिकृत बांधकाम म्हणून जादा दर आकारून कर वसूल करीत आहे. २५ टक्के व्यवसाय घटला आहे. १० टक्के व्यवसाय थांबविला.
-शैलेश काटकर, 

प्रसन्न पाखरे, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com