सावंतवाडी: ग्रामपंचायतीच्या त्रासामुळे 17 कुटुंबे दहशतीखाली
सावंतवाडी : देवसू येथील धनगर समाजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्रास देण्यात येत आहे. समाज बांधव राहत असलेली घरे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भागातील अनेक घरांना घरपट्टी तसेच घरपत्रक उतारे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येते. परिसरातील 17 कुटुंबे दहशतीखाली आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांचे आदेश धाब्यावर बसविण्यात आले आहेत. पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी आरोप केला आहे.
पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी समाज बांधवासमवेत भेट घेतली. गेले पाच ते सहा वर्षे हा प्रकार सुरु आहे. संबधित कुटुंबांना वीज, पाणी नाही त्यामुळे काय करावे या विवंचनेत कुटुंबे आहेत. या संदर्भात मडगावकर म्हणाले, संबधितांना घरे मिळणे गरजेचे आहे. अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासाकडे दाद मागू असे आश्वासन मडगावकर यांनी दिले.
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
- मराठा क्रांती मोर्चाचे संचित...
- अकोला: सायकल चालवत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आरोग्याचा संदेश
- लष्करे तैयबाचा कमांडर अबू दुजाना चकमकीत ठार
- बोलूया...'व्हर्च्युअल' जगातल्या सच्च्या मैत्रीबद्दल !
- कोयना धरणातून होत असलेल्या विसर्गात कपात
- चमोलीमध्ये चीनने घुसखोरी केल्याचे उघड
- रिमोटवरील अँथेना चीपद्वारे नागपुरच्या पेट्रोलपंपावर इंधनचोरी
- पीकविम्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
- डीवायएसपी पदासाठी विजय चौधरींचे आजपासून प्रशिक्षण
- मयत प्रेमिकेस सोडून प्रेमी फरार
- भाजप अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : शहा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.