कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद 

कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद 

नवी मुंबई -  पावसाळी वातावरणामुळे कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरू नये, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे. रविवारी (ता. 24) अलिबाग येथील काशिद समुद्रकिनारी दोन जण बुडाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी हे आवाहन केले आहे. 

काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवरून मैत्री झालेल्या अभिषेक म्हात्रे (32) आणि पूजा हे मैत्रीण रोहिणी कटारेसह रविवारी अलिबाग येथील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असताना, अभिषेक आणि पूजा हे दोघे समुद्रात उतरल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. 24) सकाळी या दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मुरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने या काळात पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी असते. मात्र, बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना याची माहिती नसल्यामुळे ते समुद्रात उतरतात. पाण्याचा अंदाज नसल्याने अनेकदा पर्यटकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरू नये. 
- किशोर साळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुरूड पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com