बेळगाव कोल्हापूर तिठ्यावर पोलिस चौकीची मागणी
सावंतवाडी: वर्षा पर्यटनाबरोबर हीलस्टेशन म्हणून प्रसिध्द असलेली आंबोली हत्यासत्रामुळे बदनाम होत आहे. त्यामुळे बदनामीपासुन आंबोलीला वाचवा, असे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी मागणी येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज (सोमवार) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्याकडे केली.
दरम्यान आंबोलीला जोडणार्या बेळगाव कोल्हापूर तिठ्यावर विशेष पोलिस चौकी बसविण्यात यावीत आणि त्याठिकाणी पोलिसांनी प्रत्येक गाडी तपासावी, अशी मागणी सुध्दा यावेळी त्यांनी केली.
आंबोलीत गेल्या आठवड्यात उघड झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमिवर श्री. साळगावकर यांनी आपले सहकारी नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माजी नगसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, श्री. पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. साळगावकर यांनी गवस यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, “आंबोली हीलस्टेशन आणि वर्षा पर्यटनामुळे जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. त्यामुळे वर्षाकाठी लाखो पर्यटक त्याठिकाणी भेट देत असताना त्याचा फायदा स्थानिक व्यापारी आणि नागरीकांना होतो; मात्र गेले काही दिवस तेथील पर्यटन गुन्हेगारीमुळे बदनाम होण्याचा प्रकार वाढला आहे. त्याठिकाणी गेल्या आठवड्याचा विचार करता सांगली येथील अनिकेत कोथळे नामक तरुणांचा खून करून पोलिसांनी याठिकाणी मृतदेह आणून टाकला होता. तर दोन दिवसापुर्वी गडहींग्लज येथील विजयकुमार गुरव या शिक्षकाचा मृतदेह पुन्हा आणून टाकला आहे. या दोन्ही घटना लक्षात घेता पर्यटनदृष्ट्या झपाट्याने विकसित होणार्या आंबोलीच्या पर्यटनाला घातक ठरणार्या आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. सद्यस्थिती असलेल्या तपासणी नाक्यावर सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष येणार्या जाणार्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यात यावा, आंबोलीला जोडणार्या कोल्हापूर बेळगाव तिठ्यावर स्वतंत्र तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात यावे.”
याबाबत आम्ही पोलिस यंत्रणा आणि गृहविभाग आता गंभीर झाला आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र आम्ही अलर्ट आहोत, असे पोलिस उपविभागीय अधिकारी गवस यांनी सांगितले.
आणखी काही मृतदेह
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, “आंबोलीच्या खोल दरीत आणखी काही मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी गिर्यारोहक तसेच ड्रोन कॅमेरे आदीच्या माध्यमातून खास पथक तयार करून दरी खोर्यात शोधमोहीम राबवावी. जेणे करुन असंख्य हत्याकांडाचा शोध लागू शकतो.”
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.