रत्नागिरीत मुसळधार; उक्षीत दरड कोसळली

रत्नागिरीत मुसळधार; उक्षीत दरड कोसळली

रत्नागिरी: हवामान विभागाच्या रेड अलर्टचा (Red Alert) अनुभव शनिवारी रत्नागिरीकरांनी (Ratnagiri)घेतला. दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले. उक्षी (ukshi) येथे घराजवळ दरड कोसळल्याने एक कुटूबांचे स्थलांतर करण्यात आले. पावसजवळील सातपर्‍याचे पाणी कॉजवे वरुन वाहू लागले तर काजळी नदी दुथडी भरुन वाहत होती. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील रस्ता जलमय झाला होता. चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूरात हलक्या सरींचे तर लांजा, खेड, दापोली, गुहागरमध्ये पावसाने हजेरी लावली.(landslide-on-home-ukshi-incident-in-ratnagiri-rain-update-marathi-news)

शनिवारी (ता. 12) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 64.80, दापोली 26.50, खेड 45.10, गुहागर 47.30, चिपळूण 59.20, संगमेश्वर 42.00, रत्नागिरी 55.20, राजापूर 58.40, लांजा 55.30 मिमी पाऊस झाला. शुक्रवारी (ता. 11) रात्री सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सकाळच्या सत्रात सगळीकडे थंडा थंडा कुल कुल अशीच स्थिती होती. काही ठिकाणी सुर्यदर्शनही झाले; मात्र रत्नागिरी तालुक्यात दुपारी 2 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. धुवाधार पडणार्‍या पावसाने नद्यांची पातळी वाढली होती. काजळी नदी दुथडी भरुन वाहू लागली असून पाणी पातळी सायंकाळी 12.06 मीटर होती. पावसाचा जोर असाच राहीला तर रात्री उशिरा धोक्याची पातळी गाठण्यची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून होते.

रत्नागिरी तालुक्यातील पानवल येथे स्वप्निल अनंत कांबळे त्यांच्या घराचे पत्रे वेगवान वार्‍यामुळे उडून अंशतः नुकसान झाले. पावसामुळे उक्षी येथील श्रीमती स्वप्नाली सीद्धार्ध कांबळे यांच्या घराजवळ दरड कोसळली. हा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. यांच्या घराच्या वरच्या बाजूला सुनील कांबळे यांचे घर आहे. त्यांच्या अंगणाचा भागाची दगड, माती घरंगळत खाली आली. स्वप्नाली यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीच्या दरवाज्यावर माती, दगड फोडून आत आले. यामध्ये नुकसान झालेले नसले तरीही घराला धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तहसिल प्रशासनाने कुटूंबातील दोघांनाही सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर केले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रभारी तहसिलदार माधवी कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सुनील कांबळे यांच्या कुटूंबीयांनाही सुचना दिल्या आहेत. पावस येथील सातपर्‍याच्या पुराचे पाणी कॉजवेवरुन वाहत होते. पुराचे पाणी किनार्‍यावरील शेडमध्ये घुसले होते.

रत्नागिरी वगळता अन्य तालुक्यात सरींचा पाऊस होता. संगमेश्‍वर तालुक्यात थांबून थांबून पाऊस होता, तर राजापूरमध्ये दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. दापोली, खेड परिसरातही असेच चित्र होते. गुहागरमध्ये दुपारपर्यंत उन होते. दापोली तालुक्यातील दाभोळ येथे विजय बोरघरे यांच्या घरावर संरक्षक भिंत कोसळली. घराला धोका असल्यामुळे त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी शहराला बसला आहे. राम आळी, मारुती आळी परिसरातील गटारे तुंबल्यामुळे रस्ते जलमय झाले होते. पालिकेने वेळेत गटारे साफ न केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. या परिसरातील लोकांच्या घरापर्यंत पाणी लागले आहे. राम आळीतील दुकानांबरोबर नागरिकांच्या घराच्या पायरीपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे नागरिक संतापलेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com