'आमदार केसरकरांकडून विकासाच्या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक'

पावसाळी बेडूक असल्याची टिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली.
kokan
kokansakal

सावंतवाडी : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा बँक या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमदार केसरकरांकडून विकासाच्या घोषणा सुरु झाल्या आहेत; मात्र त्यांच्या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक असल्याची टिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली.

अर्थ राज्यमंत्री व पालकमंत्री असतानाही गेल्या पंधरा वर्षात केसरकर काही करु शकले नाहीत, ते आता काय करणार? असा सवाल करत त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे लवकरच प्रदर्शन भरविणार असल्याचा इशाराही तेली यांनी दिला.

श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांच्या आश्वासनांच्या घोषणांचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष संजू परब, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, आदी उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, "दिपक केसरकर यांनी लवकरच जिल्ह्यात ५०० कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही २ हजार कोटींचा अम्युजमेंट पार्क, सेट टॉप बॉक्स, चष्माची फॅक्टरी अशा विविध घोषणा केल्या होत्या. ताज, सिदा दी गोवासारखी फायू स्टार हॉटेल उभारण्याचे ही त्यांनी घोषित केले होते. त्यासाठीगोरगरीब लोकांनी कवडीमोलाने आपल्या जमिनीही दिल्या.

kokan
कोण म्हणतं दोन दिवसात केळी खराब होतात? त्यासाठी या टिप्स करा फॉलो

त्याचप्रमाणे अनेक प्रकल्पांची वेळोवेळी भूमिपूजनही केली होती; मात्र त्यातील एक तरी प्रकल्प किंवा आश्वासन त्यांनी पूर्ण केले काय? बांदा-दोडामार्ग रस्त्याचे आमदार केसरकर यांनी भूमिपूजन केले. त्याचे पुढे काय झाले. साधा दोन कोटींचा रस्ता जे करू शकले नाहीत ते आता कोट्यवधींच्या वल्गना करीत आहेत. अनेक सरपंच व स्थानिक लोकांची आमच्याकडे रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगून केलेल्या फसवणुकीची पत्रे आहेत. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आता तरी जनतेची फसवणूक थांबवावी, अन्यथा तुम्हाला जनतेला आता या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील."

kokan
मंदिरं उघडली नाहीत तर, बळजबरीनं उघडावी लागतील;पाहा व्हिडिओ

ते पुढे म्हणाले, "आमदार दीपक केसरकर यांनी आतापर्यंत जिंकलेल्या सर्व निवडणुका या जनतेची निव्वळ फसवणूक करून जिंकलेल्या आहेत. निवडणूक आली की रोजगार व इतर विकासासंदर्भात कोट्यावधीच्या घोषणा करायच्या व त्यानंतर दिलेल्या आश्वासनांना पाने पुसायची हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. पावसाळा जवळ आला की ज्याप्रमाणे बेडूक बाहेर पडतात, त्याचप्रमाणे आता केसरकर विकासकामांची घोषणा करुन जनतेला आशेवर ठेवून आपला कारभार उरकायचा अशीच त्यांची भूमिका आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com