'अक्कल सांगायला आलेल्यांना धडे मिळाले'

गोरगरीबांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा बँकेवर माझा अंकुश होता - नारायण राणे
कोकण
कोकणइ-सकाळ
Summary

गोरगरीबांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा बँकेवर माझा अंकुश होता - नारायण राणे

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं मोठी लोक आली. फार काय काय बोलली. ती जिल्ह्यात अक्कल सांगायला आली होती. त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी लगावला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर यांच्यासाठी पारदर्शक कारभार करतील, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर केंद्रीय मंत्री राणे यांनी बँकेचे नूतन अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेला अक्कल सांगण्याचा प्रयत्न आलेल्या मोठ्या माणसांनी केला; मात्र निवडणूक निकाल आणि आजची निवडणूक पाहता मोठ्या माणसांना आज अकलेचे धडे मिळाले असतील.’’

कोकण
मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका

ते पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत जेवढ्या निवडणूका माझ्या नेतृत्वाखाली जिंकून दिल्या गेल्या, त्या विजयी झालेल्या सर्वांनीच चांगल काम केले आहे. फक्त एक अपशकुन झाला. तो एका व्यक्तीचा केला. त्यालाही आपण पळवून लावले आहे. हा अपशकुन गद्दार निघाला. त्याची आता लपाछपी चालू आहे. तो जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आणि माझा काही सबंध नाही. जिल्हा बँकेकडून संस्थेसाठी कर्ज काढले आहे. वर्षाला ७ ते ८ कोटी रुपये व्याज भरतोय. गोरगरीबांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा बँकेवर माझा अंकुश होता.’’

जुन्या कारभाराची चौकशी करणार

सलग चौथ्या वेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सत्ता स्थापन झाली आहे. यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार झाला होता. मधल्या काही वर्षांत तो बदलला होता; मात्र त्या कारभाराची चौकशी भाजप करणार आहे. तसेच नवीन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष चांगला कारभार करतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.

सर्व संचालकांना सोबत घेऊन काम

जिल्हा बँक उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा बँकेत प्रामाणिकपणे काम केले जाईल, असे प्रतिपादन केले. आपल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू, असा विश्वासही व्यक्त केला. तर यापूर्वी जिल्हा बँकेत झालेल्या चुकांची चौकशी केली जाईल, असेही स्पष्ट केले. सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करताना ३१ मार्च २०२२ पर्यंत या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोकण
फोन टॅपिंग लीक प्रकरणाबाबत फडणवीसांचा जबाब महत्वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com