सव्वा कोटींची बचत तरी पानवल धरण दुर्लक्षित

धरणाला ५० टक्के गळती; ६० वर्षांत दुरुस्तीविना, शीळ धरणावर ताण, पालिकेलाही नाहक भुर्दंड
सव्वा कोटींची बचत तरी पानवल धरण दुर्लक्षित

रत्नागिरी : सहा दशकांमध्ये पानवल धरणाची एकदाही मोठी दुरुस्ती केलेली नाही. धरणामुळे पालिकेची वर्षाला १ कोटी २० लाखांची आर्थिक बचत होते, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने धरणाला ५० टक्के गळती सुरू आहे. नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) शहराला पाणी पुरवणारे हे धरण आहे, तरी या धरणाच्या दुरुस्तीचा ६० वर्षांमध्ये एकदाही विचार झाला नसल्यामुळे धरणाची भिंत कमकुवत झाली आहे.

सुमारे ००.५४० दशलक्ष घनमीटर एवढी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आहे; मात्र गळतीमुळे पाणीच साठून राहत नाही. परिणामी शीळ धरणावर ताण पडत असून, पाणी उचल करण्यावर पालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. ६० वर्षांनंतर पानवल धरणाच्या दुरुस्तीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. रेड झोनमध्ये नसले तरी गळती चिंताजनक आहे. धरणाची भिंत, पाया आधी भागातून मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी साठून राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यातच या धऱणाचा शहराला पाणी पुरवण्यासाठी चांगला वापर होत आहे. त्यानंतर महिनाभरातच पाणी तळ गाठते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

५८ वर्षांमध्ये पानवल धरणाची दुरुस्ती किंवा गाळ काढण्यात आलेला नाही. धऱणाला ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सर्वसाधारण सभेत दिली. यापूर्वी या धऱणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २५ ते ३० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर ठीक नाहीतर जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्च फुकट जाईल, असे साळवी यांनी सभागृहात स्पष्ट केले होते.

विद्युत पंपांद्वारे पाणी उचल..

पानवल धरणाच्या दुरुस्तीचा पालिकेने ठराव केला. आता पानवलचे पाणी अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शीळ धरणावर त्याचा ताण पडत आहे. विद्युत पंपांद्वारे जास्त वेळ पाणी उचलावे लागत असल्याने पालिकेवर बिलाचा भुर्दंड पडत आहे.

एक दृष्टिक्षेप..

गळतीमुळे पाणीच साठून राहत नाही

शीळ धरणावर ताण; पालिकेला भुर्दंड

५८ वर्षांत दुरुस्ती किंवा गाळ काढला नाही

धरणाची १९६२ नंतर कोणतीही मोठी दुरुस्ती झालेली नाही. धरणाला ५० टक्के गळती लागली आहे. धरणाचा पाया आणि भिंतीलाही गळती आहे. आता त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

- अविनाश भोईर,

पालिका पाणी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com