मच्छीमारी हंगामाची समाप्ती, १ जुनपासून शासनाकडून बंदी जाहीर

रत्नागिरी जिल्हयातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जात
रत्नागिरी जिल्हयातील हर्णे बंदर
रत्नागिरी जिल्हयातील हर्णे बंदरsakal

हर्णै : पावसाळयात मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने १ जून ते ३१ जुलै  या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारीवर शासनाकडून बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठीची मच्छीमारांची एकच धावपळ सुरू झाली आहे.

दरम्यान, मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या पैकी ४०% नौका किनाऱ्यावर घेऊन शाकारण्याची तयारी जोरदार सुरू आहे. तर ४०% नौका या होळी सणानंतरच आंजर्ले खाडीत बंद अवस्थेत उभ्या ठेवल्या आहेत. त्यांची देखील शाकारण्याची तयारी सुरू आहे. तर उरलेल्या २०% नौकांची जयगड खाडीत शाकारण्याची तयारी सुरू आहे. उद्याच्या ३१ तारखेपर्यंत सर्वच नौका किनाऱ्यावर शाकारलेल्या असतील येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले

रत्नागिरी जिल्हयातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जात असून या बंदरात साधारणपणे ९०० ते १००० परवानाधारक मासेमारी नौका आहेत. शासनाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या काळात निर्धारित केलेल्या कालावधीत माशांचा प्रजनन काळ असल्याने या काळात मासेमारीला बंदी असते. मासेमारीला बंदी तसेच पावसाळयातील वातावरण लक्षात घेता मासेमारी बंदी असल्याने हर्णे बंदरातील बोटी जेटी नसल्याकारणाने सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मासेमारांनी आपल्या बोटी समुद्राबाहेर काढण्याची लगबग सुरू केली आहे. हर्णे बंदरात जेटीच्या अभावामुळे हर्णे बंदर, पाजपंढरी बंदर, येथे कमी प्रमाणात तर बहुतांशी नौका जयगड, आंजर्ले, दाभोळ (रत्नागिरी), आदी खाड्या सुरक्षित असल्याने याठिकाणी शाकारण्याची तयारी जोरदार सुरू आहे.

ट्रॅक्टरच्या साहाय्याने या नौका बाहेर काढल्या जात असल्याने एक दोन दिवसातच नौका बाहेर काढण्याची प्रक्रीया पुर्ण होते.गेल वर्ष मासळी हंगाम मच्छिमारांना मच्छिमारी व्यवसायात आर्थिक प्राप्तीच्या मानाने कठीण गेलेला असून मच्छिमार व्यवसाय हा तोट्यातच आहे. सुरुवातीला बदलत्या हवामानाचा फटका मच्छिमारीला बसलेला असतानाच मानव निर्मित फास्टर आणि एलईडी लॉईटव्दारे होणारी मच्छिमारी पारंपारिक मच्छिमारांची कायमचीच डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे कधी वादळसदृष्य परिस्थितीमुळे मासेमारी बंद होती तर कधी फास्टर आणि एलईडी बंदीच्या मागणीसाठी मच्छिमारांना रस्त्यावर उतरावे लागल्याने मासेमारी बंदी होती.

त्यामुळे मासेमारीतील निम्म्याहुन अधिक काळ हा वाया गेला असतानाच त्यात आणखीन भर म्हणजे मच्छिच्या दुष्काळाने मच्छिमार हवालदिल झालेले होते त्यामुळे आधिच आर्थिक गर्तेच्या चक्रात अडकलेल्या मासेमारांना बंदी काळात आपल्या बोटी बाहेर काढाव्या लागल्याने विविध संस्थाकडून घेतलेले कर्जाच्या हप्ते कसे भरावे? याची विवंचना सतावत आहे. तसेच या वर्षी डिझेलच्या चढत्या दराने मच्छीमारांचे कंबरडेच मोडले होते. हंगामाच्या सुरुवातीला ८० रू प्रती लिटर दर होता. आणि तो दर वाढत वाढत १२३ रू प्रती लिटर पर्यंत गेल्यामुळे आठ महिन्यात ४३/- रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मच्छीमारांनी नौका मासेमारीला जाण्याऐवजी बंद अवस्थेतच उभ्या ठेवणे पसंत केले यामध्ये मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले.

गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी च्या डिझेल दरवाढीने आमचे तोंडचं फोडले. आठ दिवसांसाठी मासेमारीला जाण्यासाठी १००० लिटर डिझेल भरायचे असेल तर किमान लाख ते सव्वा लाख रुपयांची व्यवस्था करायला लागत होती त्यामुळे खूपच खर्चिक होत होते पण तेवढे मिळालेल्या मासळीतून वसूल ही होत नाही सगळा व्यवसाय तोट्यातच आहे. असे येथील मच्छीमार अनंत चोगले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com