रत्नागिरी जिल्ह्यात उभारणार चार चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प

रत्नागिरी जिल्ह्यात उभारणार चार चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प

रत्नागिरी - जिल्ह्यात चार ठिकाणी राष्ट्रीय बहुउद्देशीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (केंद्र) उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण कोकणात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सुमारे १५ एकर जागेमध्ये एक केंद्र असणार आहे.

चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यापासून किनारी भागातील लोकांचे वादळ आणि त्सुनामीपासून संरक्षण करण्याचे काम हे केंद्र करणार आहे. तालुक्‍यातील कोतवडे येथील जागा निश्‍चित झाली आहे. दापोली, गुहागर, खेड आदी ठिकाणी जागेची चाचपणी सुरू आहे. इतर हंगामात अन्य कार्यक्रमांसाठी या बहुउद्देशीय केंद्रांचा उपयोग होणार आहे. 

कोकण किनारपट्टी भागात आपत्ती निवारणाचे काम करणाऱ्या यंत्रणांची गुरुवारी मुंबईत परिषद झाली. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेघा गाडगीळ परिषदेच्या अध्यक्षा होत्या. या परिषदेमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गुजरात, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांनी ही केंद्रे उभारली आहे. त्याचे प्रेझेंटेशन आणि माहिती या परिषदेत देण्यात आली. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत चक्रीवादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कोकणात बसविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहराचा व उपनगर या जिल्ह्यामध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 
जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्ष, पोलिस, अग्निशमन दल, नौदल, कोस्टल गार्ड, मेरीटाईम बोर्ड, शिपिंग कॉर्पोरेशन, बीएसएनएल आदी कार्यालयांचा सहभाग असणार आहे. या यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यात आली. बहुद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्र, भूमिगत वीजपुरवठा केंद्र, खारभूमी प्रतिबंधक बंधारे मजबूत करणे आदी कामांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने त्याअनुषंगाने तयारी केली आहे. कोतवडे (ता. रत्नागिरी) येथे १५ एकर जागेची पाहणी करून त्याचे संमतीपत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे. दापोली, गुहागर आदी भागातही ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जागेची पाहणी सुरू आहे. 

किनारी भागातील आपत्ती निवारणाचे काम करण्याऱ्या यंत्रणांची मुंबईत नुकतीच परिषद झाली. या परिषदेमध्ये भविष्यात वादळ, त्सुनामी आदी धोके निर्माण झाल्यास त्यापासून किनारी भागातील लोकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने बहुद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कोतवड्यातील १५ एकरची जागा निश्‍चित झाली आहे. उर्वरित ठिकाणी चाचपणी सुरू आहे.
 - अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com