भटक्‍या विमुक्त जमाती आयोग कायमस्वरूपी करा - इदाते

भटक्‍या विमुक्त जमाती आयोग कायमस्वरूपी करा - इदाते

दाभोळ - देशात ५७१ विमुक्‍त जमाती, १ हजार भटक्‍या, २५ अर्धभटक्‍या जमाती आहेत. देशात कायमस्वरूपी भटक्‍या विमुक्‍त जमाती आयोगाची स्थापना करावी, महाराष्ट्राच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्ये या जमातींसाठी संचालनालय व आर्थिक महामंडळ उभारावे आदी सूचना भटक्‍या विमुक्‍त जमाती आयोगाच्या अहवालात करण्यात आल्या आहेत.

आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे आपला अहवाल सुपूर्द केला. नवी दिल्लीच्या शास्त्री भवनात इदाते यांनी आयोगाचे सदस्य श्रवण सिंह, सदस्य सचिव बी. के. प्रसाद यांच्या उपस्थितीत अहवाल दिला. ९ जानेवारी २०१५ ला हा आयोग स्थापन झाला होता. अहवालात ३० सूचना व ८३ उपसूचना केल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात भेटी देऊन आयोगाने तपशील गोळा केला. 

  •  देशात ५७१ विमुक्त जमाती
  •  १ हजार भटक्‍या, २५ अर्धभटक्‍या
  •  अहवालात ३० सूचना व ८३ उपसूचना

कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने या आयोगाची निर्मिती करून ३ वर्षांत अहवाल सादर करावा, असे म्हटले होते. मात्र, इतर आयोगांसारखी कोणतीही मुदतवाढ न घेता या आयोगाने आपला अहवाल वेळेत सादर केला आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com