पाणी
पाणी sakal

Ratnagiri : शहराला आजपासून नियमित पाणी

रत्नागिरी पालिका प्रशासन; दिवसाआडचे नियोजन यशस्वी

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने वरुणराजासह रत्नागिरी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिना ते दीड महिने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उद्या (ता. २६) पासून नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. पाऊस लांबल्याने मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी खबरदारी म्हणून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता, तो यशस्वी ठरला आहे.

शीळ धरणात सध्या ०.१५५ दशलक्ष घनमीटरपेक्षाही जास्त पाणीसाठा आहे. शहरासाठी राबवण्यात आलेल्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम यंदा पूर्ण झाले आहे. शीळ जॅकवेलमधून सुमारे साडे सहा कि.मी. अंतरावरून पर्यायी नवीन मुख्य जलवाहिनी साळवी स्टॉपच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणली आहे. जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ती वारंवार फुटत होती. त्यात अनेक ठिकाणी गळती असल्याने ३० टक्के पाणी वाया जात होते. नवीन वाहिनीमुळे गळती थांबली.

जॅकवेलमध्ये तीन नवीन विद्युत पंप बसवले. जलशुद्धीकरण केंद्राचे काम केले. यामुळे यंदा शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल, असा दावा शिवसेनेचे सत्ताधारी आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने केला होता; प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी हे सर्व लक्षात घेऊन खबरदारी म्हणून मे महिन्यात शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. शीळ धरणाच्या पाणीसाठ्याची नुकतीच पाणी अभियंता भोईर यांनी पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी बाबर यांनी उद्यापासून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com