रत्नागिरीत विंचवांची दहशत; एकाच दिवशी 69 जणांना डंख (व्हिडिओ)

Scorpion bite to 69 people in Ratnagiri
Scorpion bite to 69 people in Ratnagiri

रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या विंचवांच्या प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या जाकादेवी परिसरात तर मोठ्या प्रमाणावर विंचू दिसून येत आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी 38 जणांना तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी तब्बल 21 जणांना विंचवांनी डंख मारला आहे. गेल्या सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 195 जणांना विंचवांनी डंख केला आहे.

साप, विंचू यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण कोकणात आधीच मोठं आहे. त्यातच आता रखडलेल्या पावसामुळे कापलेल्या भाताच्या पेंड्या शेतात तशाच पडून राहिल्यात. पेंड्यांच्या खाली निर्माण होणाऱ्या उष्ण वातावरणात हे विंचू आश्रयाला येतात. या पेंड्या उचलण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना हे डंख केले जात आहेत.



विंचू विषारी प्राणी आहे
भारतात 120 प्रकारचे विंचू दिसतात..महाराष्ट्रात विंचवांचे दोन प्रकार आहेत..काळा विंचू आणि लाल विंचू. त्यापैकी काळा विंचू महाराष्ट्रात सर्वत्र दिसतो. तर लाल विंचू प्रामुख्यानं कोकणात दिसतो. हा अधिक घातक असतो आणि त्यांच्या डंखामुळे प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो. 

कोकणात त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात सध्या या विंचवांनी धुमाकूळ घातलाय. त्यामुळे रत्नागिरीकरांनी शेतीची कामं करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com