आम्हाला कुणी घर देता का घर?

In sindhudurg district mumbaikar searching houses for quarantine
In sindhudurg district mumbaikar searching houses for quarantine

वैभववाडी : चौदा दिवस राहण्यासाठी कुणी बंद घर देता का बंद घर! शौचालय, बाथरूमने युक्त; पण लोकवस्तीपासून दूर असलेले स्वतंत्र बंद घर, अशी विचारणा सध्या मुंबईस्थित हजारो चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावातील आजूबाजूच्या लोकांकडे करीत आहेत. जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक बंद घरे होम क्वारंटाईनमुळे गजबजली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यापुढे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी बंद घरे मिळेनाशी झाल्याने त्यांची बैचेनी वाढली आहे.

चाकरमान्यांना महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको, एक हवं लहान घर, अशी काहीशी अवस्था सध्या आहे. कोरोनाचा मुंबईतील संसर्ग थांबताना दिसत नाही. आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलणारे हजारो चाकरमान्यांचा संयम आता सुटू लागला आहे. मुंबईत राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे, असा विचार करून ते कोकणात येऊ लागले आहेत. दिवसाला तीन ते चार हजार चाकरमानी दाखल होत आहेत. जिल्हा प्रशासनाची तालुकास्तरावरील संस्थात्मक विलगीकरण कक्ष कधीचेच भरले आहेत. गावागावांतील शाळा माणसांनी भरल्या आहेत. त्यामुळे आता संस्थात्मक क्वारंटाईन कक्षामध्ये जागा शिल्लक राहिलेली नाही.

 हे पण वाचा - वनअधिकार्‍यांचे धाडस ; फिल्मी स्टाईलने बिबट्यावर घातली झडप आणि केले जेरबंद....

जिल्ह्यातील चाकरमान्यांचा ओढा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन प्रक्रियेच्या निकषात वेळोवेळी बदल केले आहेत. सुरुवातीला रेडझोनमधून येणाऱ्या व्यक्तींसाठी 14 संस्थात्मक क्वारंटाईन आणि 14 दिवस होम क्वारंटाईन होते; परंतु त्यामध्ये पुन्हा बदल करण्यात आला. सध्या कंटेन्मेंट झोन वगळता इतर झोनमधून आलेल्यांना होम क्वारंटाईन पर्याय आहे; परंतु त्यासाठी स्वतंत्र घरांची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. संस्थात्मक क्वारंटाईनमुळे मुंबईतील हजारो चाकरमान्यांनी गावी येण्यास नकार दिला होता; परंतु होम क्वारंटाईन पर्याय पुढे आल्यामुळे आता अनेक जण गावी येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे चाकरमानी गावी आपल्याला बंद घर मिळेल का, याची विचारणा गावातील जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडे करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील हजारो व्यक्ती मुंबईत नोकरीनिमित्त आहेत. यातील अनेकांनी आपापल्या गावात स्वतंत्र घरे बांधून ठेवली आहेत. ते लोक आपापल्या घरांमध्ये होम क्वारंटाईन झाले आहेत; परंतु ज्यांचे गावात घर आहे; परंतु त्या घरात गावाकडचे लोक राहत आहेत. ते मात्र स्वतंत्र बंद घराच्या शोधात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 20 हजारांहून अधिक बंद घरे क्वारंटाईनमुळे वापरात आली आहेत. सद्यस्थितीत बंद घरे मिळणे, चाकरमान्यांसाठी मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांसाठी शौचालय, बाथरूम असलेले व लोकवस्तीपासून दूर असलेले, कुणी घर देता का घर, अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com