भारती डिफेन्सच्या बाजूने ‘स्वाभिमान’

भारती डिफेन्सच्या बाजूने ‘स्वाभिमान’

रत्नागिरी - मिऱ्या येथील भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीचे कामकाज सुरू करण्यासाठी काही कंत्राटदारांबरोबर मुंबईत करार केला; मात्र काही स्थानिक कंत्राटदारांकडून त्याला विरोध होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू करणाऱ्या तरुणांना स्वाभिमान पाठबळ देणार आहे. 

स्वाभिमानचे नेते खासदार नारायण राणे आणि सरचिटणीस नीलेश राणेंना याबाबत साकडे घातले, अशी माहिती स्वाभिमानकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी स्वाभिमानचे संकेत चवंडे, नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर यांच्यासह कंत्राटदार रूपेश सावंत, कंपनीचे हेड अरविंद सावंत, नरोन्ना, ग्रामस्थांतर्फे आप्पा वांदरकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. 

बंद पडलेली जुनी भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करण्यावरून मिऱ्यामधील ग्रामस्थांमध्ये राजकारण सुरू झाले. त्यासाठी आम्ही स्वाभिमानचे नीलेश राणेंची भेट घेतली, असे रूपेश सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. शिपयार्ड कंपनी सुरू करण्यासाठी स्वाभिमान प्रयत्न करेल, असे श्री. चवंडे यांनी सांगितले.

कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदार आणि न्यायालय या चार विभागांत कंपनी अडकलेली आहे. त्यातून मार्ग काढत जहाज दुरुस्तीची कामे सुरू करण्यासाठी रूपेश सावंत यांच्याबरोबर कंपनीने मुंबईत करार केला. त्याच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत; मात्र व्यावसायिक गुप्ततेसाठी ती कागदपत्रे पाहण्यास आम्ही देऊ शकत नाहीत. त्यासाठी संबंधितांनी एनसीएलटी न्यायालयात उपस्थिती लावून ती पाहावीत, असे कंपनीचे अरविंद सावंतयांनी सांगितले. 

‘स्वाभिमान’चे स्वागत
कंपनी सुरू करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले पाहिजे. यापूर्वी अनेकांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्याला यश आले नाही. तो नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षामुळे सुटणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे ग्रामस्थ आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com