
मंडणगड - शिक्षकाच्या कुटुंबाला 30 लाखांची विमा रक्कम सुपूर्द
...
-rat12p37.jpg
L21370
ः मंडणगड ः जनार्दन पवार यांच्या पत्नी आशा पवार यांच्याकडे ३० लाखांच्या रक्कमेचा धनादेश सुपूर्द करताना जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, इफ्को टोकियो कंपनीचे महाड शाखा व्यवस्थापक नंदकुमार साळवी व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
-------
३० लाखांची विमा रक्कम सुपूर्द; ३ लाखांचे कर्जही माफ
रत्नागिरी जिल्हा बँकेकडून शिक्षकाच्या कुटुंबाला दिलासा; मंडणगडात अपघातात झाले होते निधन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने इफ्को टोकिया जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या माध्यमातून काढलेल्या कर्ज विमा व अपघातविम्याचा लाभ तालुक्यात कार्यरत असलेल्या जनार्दन परसराम पवार या शिक्षकाच्या कुटुंबास झाला. बँकेने इफ्को टोकियो कंपनीच्या माध्यमातून काढलेल्या विम्यामुळे लाभ्यार्थ्यांच्या अपघातात मृत्यू झाल्याने बँकेने कंपनीकडे नुकसान भरपाईपोटी केलेला ३० लाखांच्या रक्कमेचा प्रस्ताव मंजूर झाला. याशिवाय मृत लाभार्थीचे २ लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले. यामुळे कर्जमुक्त होण्याबरोबरच शिक्षकाच्या कुटुंबीयांनी ३० लाख रुपये इतकी रक्कम मिळाली. या दोन्ही विम्याचे क्लेम मंजूर झाल्याने रक्कमेचे धनादेश त्यांच्या पत्नी आशा पवार व कुटुंबीयांना देण्यासाठी १२ मे रोजी शहरातील जिल्हा बँकेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, इफ्को टोकियो कंपनीचे महाड शाखेचे व्यवस्थापक नंदकुमार साळवी, क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक भाऊसाहेब पाडलेकर, सहकार अधिकारी शामल शिरसागर, शिक्षणविस्तार अधिकारी सहदेव सुतार, शिक्षकसंघाचे तालुकाध्यक्ष मनेश शिंदे, माजी सभापती भाईसाहेब पोस्टुरे, राठोड, आशा पवार, एकनाथ दळवी या मान्यवरांसह, जिल्हा बँकेचे कर्मचारी व तालुक्यातील विकास संस्थाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
रमेश दळवी म्हणाले, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांशी आपुलकीचे संबंध यामुळे देशातील सर्वोत्तम बँकामध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश झाला आहे. विमा रक्कम मंजूर होण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करणारे लाभार्थीचे परिजन व बँकेच्या कर्मचारी व विमा कंपनीचे कर्मचारी यांचे त्यांनी या वेळी आभारे मानले.
..
चौकट
आधार बनण्याचे भाग्य मिळणे हे भाग्य
या वेळी बँकेचे संचालक रमेश दळवी म्हणाले की, अपघात वा मृत्यू या दोन्ही घटना अप्रियच आहेत; मात्र अशा दुःखदप्रसंगी आधार बनण्याचे भाग्य मिळणे हे बँकेचे भाग्य आहे. बँकेत पगारदार खातेदार असणाऱ्या निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांच्या विमा काढण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने घेतला व त्यामुळे एका कुटुंबास दुःखातून सावरण्याची संधी मिळत आहे. ही बँकेकरिता समाधानाची बाब आहे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57578 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..