
महामार्गालगत भराव टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
swt198.jpg
22901
गुरूदास गवंडे
भराव टाकणाऱ्यांवर कारवाई करा
गुरूदास गवंडेः पुन्हा पुर येण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः बांदा चेकनाका ते नेमळे या झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या बाजूला भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भराव टाकणाऱ्यांवर चार पट दंड आकारण्यात यावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बांदा ते नेमळे हायवेपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या साईडला अनधिकृत माती उत्खनन करून भराव टाकण्यात आलेला आहे. यामुळे इन्सुली, निगुडे, बांदा आदी परिसरात पुराचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामध्ये नुकसान झालेल्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. पुर परिस्थितीला जबाबदार ठरणारी ही भरावाची माती त्या ठिकाणी कोणी आणली? कशी आणली? त्यासाठी आवश्यक असलेली रॉयल्टी भरली आहे का? याचीही चौकशी करण्यात यावी. महसूल अधिनियमाप्रमाणे रॉयल्टी भरलेली नसल्यास उत्खनन केलेल्यांना चार पटीने दंड आकारण्यात यावा तसेच सध्या देखील हायवेवर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केली जात असून माती उत्खननामुळे पूर्वीचे पाण्याचे प्रवाह बुजवण्यात आले आहेत. निगुडे-पाटीलवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून पाईपलाईन टाकण्यात आल्याने भविष्यात पुन्हा या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या येणाऱ्या आपत्तीला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात पावसाळ्यात पुराचे पाणी साचून त्या ठिकाणी असणाऱ्या घरांना बाधा पोहोचल्यास संपूर्ण महसूल यंत्रणा जबाबदार राहिल, असे पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59622 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..