
राजापूर-रस्त्याचे काम करताना पथदीपाच्या वाहिन्या तुटल्या
रस्ते कामात पथदीपाच्या वाहिन्या तुटल्या
राजापुरात पथदीप बंद; नागरिकांची गैरसोय
राजापूर, ता. २० ः शहरातील मुख्य रस्त्यासह छत्रपती शिवाजी महाराज मार्गासह जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ऐन गर्दीच्या हंगामात शहरवासीयांसह बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे करताना अनेक ठिकाणी रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या वायर तुटल्याने अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तकार करूनही स्ट्रटी लाईट सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी सांगितले.
राजापूर शहरातील जवाहर चौक ते चिंचबांध या छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या काँकिटीकरणाचे काम केले आहे तसेच सद्यःस्थितीत जवाहर चौक ते तालीमखाना या मुख्य रस्त्याचे व या रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात रस्त्याची खोदाई केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस हा रस्ता एसटीसह अन्य मोठ्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
..
चौकट
प्रशासन व ठेकेदाराचे दुर्लक्ष
रस्ता दुरुस्तीसाठी व जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करताना अनेक ठिकाणच्या स्ट्रीट लाईटच्या वायर तुटल्या आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस रस्त्यावरील लाईट बंद स्थितीत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून आपण स्वतः अनेकदा प्रशासनाला स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत; मात्र प्रशासन व ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळा तोंडावर आला असून अद्याप मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60059 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..