
जनतेच्या प्रश्नांचा सत्ताधाऱ्यांना विसर
31458
प्रसाद गावडे
जनतेच्या प्रश्नांचा सत्ताधाऱ्यांना विसर
प्रसाद गावडे ः मनसेला संधी देणे हिताचे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः स्वार्थी सत्तासंघर्षात सत्ताधारी पक्षांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. सत्ताधारी पक्ष मात्र नौटंकीत व्यस्त आहे. जनतेने आता राज ठाकरेंना आजमावून संधी देणे हिताचे आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी म्हटले आहे.
गावडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राज्यसभेच्या निवडणुकांपासून राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये टोकाचा सत्तासंघर्ष वाढीस लागला आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शह-काटशहाच्या नौटंकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तासंघर्षाच्या राजकारणात व्यस्त असल्याने सर्वसामान्य जनता मात्र यात भरडली जात आहे. समाजातील दुःखी, कष्टी जनतेचा विसर या नादान राज्यकर्त्यांना पडलाय असेच चित्र आहे. या सगळ्या गलिच्छ राजकारणात राज्यातील जनतेला गृहीत धरले जात असून जनतेनेच आता त्यांना धडा शिकवण्याची खरी गरज आहे. स्वार्थापायी पक्षनिष्ठा, पक्षाची ध्येय-धोरणे गहाण ठेवून राजकारण करणारे पक्ष हवेत की सर्वसामान्य जनतेला दैनंदिन भेडसावणारे प्रश्न आक्रमकपणे मांडून महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी झटणारे, अडचणीच्या प्रसंगी ठाम उभे राहणारे, स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे राज ठाकरे हवेत. याचा गांभीर्याने विचार आता जनतेनेच करण्याची काळाची गरज असून तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71020 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..