
कणकवली राज्यात प्रथम
कणकवली राज्यात प्रथम
विधवा प्रथा निर्मूलन ः ६३ ग्रामपंचायतींतर्फे ठराव संमत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः विधवा प्रथा निर्मुलन ठराव घेणारा कणकवली तालुका हा राज्यात सर्वप्रथम ठरला आहे. तालुक्यातील सर्व ६३ ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील विधवा प्रथा निर्मूलनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीसाठी ठराव घेण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार कणकवली तालुक्यातील सर्व ६३ ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव घेत एक राज्यात आदर्श कणकवली तालुक्याने निर्माण केला आहे. यापूर्वी देखील कणकवली तालुक्याने शासनाच्या विविध उपक्रमांत बहुमान पटकावलेले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी दिली.
कणकवली तालुक्याने विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सर्वात प्रथम कणकवली तालुक्यात हुंबरट या ग्रामपंचायतमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत करण्यात आला. हजारो वर्षांपासून ही प्रथा असल्याने जनजागृती करत तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव संमत करत पहिले पाऊल यशस्वी टाकले आहे. महाराष्ट्र राज्यात तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत समिती प्रथम आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी कणकवली तालुक्याने हागणदारीमुक्त, पर्यावरण संतुलित ग्राम, लोकराज्य,तंटामुक्त, यशवंत पंचायतराज अभियानात यश संपादन केले आहे.आता विधवा प्रथा बंदी करण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांनी व पत्रकारांनी जनजागृती केल्याने यश मिळाले,असल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72873 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..