
योग्य नियोजन हीच यशाची गुरुकिल्ली
39362
आरोंदा ः गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.
योग्य नियोजनच यशाची गुरुकिल्ली
अॅड. परिमल नाईक ः भांगले प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करणे गरजेचे आहे. आयुष्यातही योग्य नियोजन हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत माजी नगरसेवक अॅड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले. मोहन भांगले प्रतिष्ठान, आरोंदा या संस्थेतर्फे दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, व्यवस्थापक चेतन आरोसकर, सावंतवाडी कॉलेजचे प्राध्यापिका नीलम धुरी, सरपंच सुप्रिया पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य गीतांजली वळणेकर, सिद्धेश नाईक, दिलीप नाईक, मनोहर आरोंदेकर, विद्याधर् नाईक, नारायण राणे, हनुमंत कुबल, पूनम गावडे, प्रतिष्ठानचे विश्वस्त ऑगस्तीन फर्नांडीस, केदार शिरोडकर, गोविंद मटकर, लायन्स क्लब सावंतवाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेला सतरा वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षीपासून आरोंदा गावचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा उद्योजक डॉ. पी. वाय. नाईक यांनी त्यांच्या पत्नी (कै.) पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ सावंतवाडी तालुक्यात पथम आलेल्या तेजस्वी व तेजस्विनी पुरस्कार देण्यात आले. यात सेजल पवार व वरदा सावंत यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे गावातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात आला. हा मान हिलेखा नाईक हिला मिळाला. त्याचप्रमाणे सुकन्या पुरस्कार, शामसुंदर कुबडे स्मृती पुरस्कार, प्रेरणा, यशवंत व प्रयास असे अनेक रोख स्वरूपातील पुरस्कार देऊन गावातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव रामदास पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81972 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..