
रत्नागिरी- टिळकांच्या प्रेरणादायी विचारातून स्फूर्ती घ्या
rat2p8.jpg
40150
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात व्याख्यान देताना राजेंद्रप्रसाद मसुरकर. सोबत डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी.
टिळकांच्या प्रेरणादायी विचारातून स्फूर्ती घ्या
राजेंद्रप्रसाद मसुरकर; गोगटे महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी
रत्नागिरी, ता. २ः लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ निष्काम कर्मयोगाचे आयुष्य कसे जगावे हे तत्त्वज्ञान सांगतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्याचे लेखन केले. मानवी शरीर नश्वर असून, आत्मा चिरंतर आहे. या शरीरामुळे तुमच्या आत्म्याला तात्विक अधिष्ठान मिळते, असा मूलभूत विचार टिळकांनी सांगितला. त्यांचे तत्त्वज्ञान आणि विचार समकालीन परिस्थितीशी निगडित असून, भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचार कार्यापासून स्फूर्ती घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे म्हणून दरवर्षी महाविद्यालयाच्यावतीने अभिवादन यात्रा आणि पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक योगी, साधक साधना करत असताना गीतेला प्रमाण मानतो. टिळकांनीदेखील आपल्या जीवनात श्रीकृष्णाला आदर्श मानून वाटचाल केली. या प्रसंगी इंग्रजी विभागाच्या जिजेसियन्स या न्यूजलेटरचे मान्यवरांच्या हस्ते ई-प्रकाशन करण्यात आले. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध परीक्षा, स्पर्धामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विजेत्या विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. त्यात स्वरूप काणे (कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक), आशिष कुलकर्णी आणि वृषाली मांडवकर (कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक), कल्पजा जोगळेकर, तन्वी मोरे, मीरा काळे (लोकमान्य टिळक पारितोषिक आणि संस्कृत विभागाचे पारितोषिक), गौरी हळदवणेकर (कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
चौकट 1
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल
वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातील अनुक्रमे स्वरूप काणे, मनस्वी नाटेकर, स्नेहल घाडी यांनी यश मिळवले. निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे गौरी कुलकर्णी, दिशा हरमाले, वर्षा सांडीम, भाग्यश्री काकतकर यांना बक्षीस दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83249 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..