
राजापूर-सरपंच आडिवरेकरांनी राजीनामा द्यावा
सरपंच सुप्रिया आडिवरेकरांनी राजीनामा द्यावा ः कपाळे
राजापूर, ता. ६ ः सरपंच सुप्रिया आडिवरेकर या भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडून आल्या आहेत; मात्र, त्यांनी गावविकास पॅनेलची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपदासह सरपंचपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आव्हान तुळसवडेचे उपसरपंच संजय कपाळे यांनी सरपंच आडिवरेकर यांना दिले आहे.
सात सदस्यसंख्या असलेल्या तुळसवडे-सोलिवडे ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलचे वर्चस्व होते. सातपैकी चार सदस्य गावविकास पॅनेलचे असून त्यामध्ये सरपंच आडिवरेकर यांचा समावेश होता. मात्र, आडिवरेकर यांनी नुकतेच शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशातून शिवसेनेची ताकद वाढताना भाजपला राजकीयदृष्ट्या धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपसरपंच कपाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावविकास पॅनेलच्या उमेदवार म्हणून लोकांनी आडिवरेकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. मात्र, त्यांनी भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलची साथ सोडून शिवसेनेला साथ दिली आहे.
------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84612 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..