रत्नागिरी ः शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त

रत्नागिरी ः शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त

रत्नागिरी जिल्हा परिषद---L74629

शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त

३० डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू ;१८ फेब्रुवारीपर्यंत आदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षापासून न साधलेला मुहूर्त मिळाला. ३० डिसेंबरपासून गुरूजींच्या बदल्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. यात संवर्ग एकमधील २४१ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, शुक्रवारी (ता. ६) जानेवारीला १०६ शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रीरण (संवर्ग दोन) साठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी १०५ जणांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत.
शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अडथळ्यांची शर्यत पार करत ही पक्रिया सुरू आहे. संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यात २४१ प्राथमिक शिक्षकांची सोय झालेली आहे. सोमवारी संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या बदल्यांची यादी ऑनलाइन जाहीर झाली. ऑनलाइन बदल्यांसाठी शिक्षकांना शाळांचे पर्याय सॉफ्टरवेअरमध्ये भरावी लागत आहे. सुरवातीला संवर्ग १ म्हणजेच दिव्यांग, ५३ वर्षांवरील शिक्षक, विधवा, परितक्त्या शिक्षकांचा विचार केला जातो. यामध्ये १ हजार २१३ शिक्षक पात्र ठरले आहेत. त्या शिक्षकांना बदलीसाठीचे शाळा विकल्प भरावयाचे होते. यासाठी सहा दिवसांची मुदत होती. त्यामध्ये २६९ शिक्षकांनी प्राधान्यक्रमानुसार शाळांची नावे ऑनलाइन भरली होती. ९४४ शिक्षकांनी बदलीप्रक्रियेतून माघार घेतली तर २८ जणं हे बदलीपात्रच्या यादीत असल्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. २४१ शिक्षकांच्या बदलीची यादी जाहीर झाली; मात्र बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळांवर रूजू होण्यासंदर्भात अजूनही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.
जिल्ह्यात १ हजार २१३ प्राथमिक शिक्षक बदल्यांसाठी पात्र होते. संवर्ग एक शिक्षकांचा समावेश असून यात पेसा भागात (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांचा यात समावेश असतो. या संवर्गातील शिक्षकांना १० ते १४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर संवर्ग ४ मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आणि उर्दू माध्यमासाठी २७२ शिक्षकांचा समावेश आहे. अजूनही १ हजार ३३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रीकरण (संवर्ग दोन) साठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. एकूण १०६ जणांनी अर्ज दाखल केले होते; मात्र त्यापैकी १०५ जणांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत. एक अर्ज काही तांत्रिक गोष्टीमुळे फेटाळण्यात आला.

चौकट
अपेक्षित शाळा मिळाल्या
या प्रक्रियेमध्ये बहुसंख्य शिक्षकांना अपेक्षित शाळा मिळाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. प्राधान्यक्रमामध्ये एक ते ३० विकल्प भरावयाचे होते. त्यानुसार शिक्षकांनी शाळांची नावे भरलेली होती. बदली झालेल्यांपैकी बहुसंख्य शिक्षकांना पहिल्या क्रमांकाच्या शाळेत बदली झालेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com