रत्नागिरी-देसाई हायस्कूलचे ''राखेतून उडाला मोर'' द्वितीय

रत्नागिरी-देसाई हायस्कूलचे ''राखेतून उडाला मोर'' द्वितीय

rat२१p६.jpg
७७१०४
रत्नागिरीः अ. के. देसाई हायस्कूलचे कोल्हापूर येथे प्राथमिक फेरीत झालेल्या राखेतून उडाला मोर या बालनाट्यातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------
देसाई हायस्कूलचे ‘राखेतून उडाला मोर’ द्वितीय
अंतिम स्पर्धेत प्रवेश; दिग्दर्शन, प्रकाश योजना द्वितीय, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे
रत्नागिरी, ता. २१ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह-कोल्हापूर येथील केंद्रावर झालेल्या १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या ‘राखेतून उडाला मोर’ या बालनाट्याने प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक पटकावून अंतिम नाट्यस्पर्धेत प्रवेश केला आहे. या बालनाट्यासाठी दिग्दर्शन द्वितीय व अभिनय गुणवत्ता पारितोषिके पटकावली.
राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर व विष्णूदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे अतिशय जल्लोषात झाली होती. या स्पर्धेत एकूण ४० बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते. राखेतून उडाला मोर या बालनाट्यासाठी हायस्कूलचे शिक्षक संतोष गार्डी यांना दिग्दर्शनाचे द्वितीय, प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर द्वितीय तर या बालनाट्यासाठी अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे तनया लिंगायत, भावेश खरात या मुलांच्या अभिनयाला मिळाली आहेत.
एका दुर्गम भागातील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या मुलांची कथा लेखक डॉ. सतीश साळुंखे यांनी राखेतून उडाला मोर या बालनाट्यातून साकारली आहे. देसाई हायस्कूलचे मुख्यध्यापक प्रमोद शेखर यांच्या निर्मितीतून तयार झालेल्या या बालनाट्यात तनया लिंगायत, अर्थव गोणबरे, भावेश खरात, सुखदा गावकर, रितू आखाडे, अमन जाधव. प्राजक्ता लवंदे, अनिल थापा, विकास देवांगण, महेक मुल्ला, पार्थ जांभळे, गणेश थापा, स्वरूप आडविलकर, शैलेश धावडे, सोहम मोहिते या मुलांनी अभिनय साकारला आहे तर पार्श्वसंगीत निखिल भुते, प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर, यश सुर्वे, नेपथ्य प्रवीण धुमक-दत्ताराम घडशी, रंगभूषा नरेश पांचाळ, वेशभूषा अंजली पिलणकर, सहाय्य, आभार ओंकार पाटील, स्वानंद मयेकर. सूत्रधार दुर्वेश सागवेकर. रंगमंच व्यवस्था व्यास गावंड, अक्षय सावंत, सानिका वाडेकर, अलिशा जाधव यांनी केली आहे.

चौकट
बालनाट्याची कथा
बालनाट्यात स्मशानभूमी परिसरात झोपडी बांधून राहणारं कुटुंब आहे. त्यांचा उदरनिर्वाह फक्त प्रेतासाठी आणलेल्या अन्नातूनच होत असतो. प्रेत जाळण्याच्या नवीन पद्धतीमुळे त्यांना अन्न मिळणेही शक्य होत नाही; पण त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची ओढ, श्रीमंत मुलांकडून होणारा अपमान अशा गोष्टींमुळे शिक्षण घेण्याऱ्या मुलांची जिद्द कमी करत असतात; मात्र मुलांचा ध्यास आणि त्यानंतर शासनाने केलेले प्रयत्न या दुर्गम भागातील अत्यंत गरीब मुलांना शिक्षण पुढे जाण्याचे संकेत मिळतात अशी कथा या नाटकातून अधोरेखित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com