सदर ः संस्कारमय शिक्षण ः काळाची गरज

सदर ः संस्कारमय शिक्षण ः काळाची गरज

--

२३ जाने टुडे २ वरून लेखक फोटो व लोगो घेणे.....
rat२९p.jpg ः - डॉ. गजानन पाटील

लोकल टू ग्लोबल ............................लोगो

संस्कारमय शिक्षण ः काळाची गरज

इंट्रो

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांवर नैतिक संस्कार करण्यावर भर देण्यात आलेला आहे. या नव शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या अभिरूचीनुसार शिक्षण देत असताना त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत समाजाची राहणार आहे. नुकतेच एक संशोधन झाले. या संशोधनामध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची कमतरता पाश्चात्य राष्ट्रासोबत आपल्या देशातही निर्माण झालेली पाहायला मिळाली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता आज विद्यार्थ्यांवर उत्तम नैतिक संस्कार करणे, नीतिमुल्यांची जडवणूक घडवणं गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या बदलत्या वर्तनाचा परिणाम त्यांच्या शालेय अभ्यासावर होत असताना दिसून येत आहे. मुलं शिक्षक, पालक किंवा समाजातील इतर मोठ्या माणसांशी ज्या प्रकाराचे वर्तन करायला हवे त्या प्रकाराचे वर्तन करताना दिसून येत नाहीत, हे सत्यच आहे. या संदर्भात अनेक खासगी संस्थांनी संशोधनही केले आहे. या संशोधनामध्ये संस्काराची गरज शालेय शिक्षणात फार महत्वाची मांडली गेली आहे. यासाठी शालेय शिक्षणात नीतिमुल्यांचे शिक्षण नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे.

- डॉ. गजानन पाटील
----------------

आपल्या देशात प्राचीन काळी गुरूकूल शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थी गुरूच्या घरी १२ वर्षे शिक्षण घ्यायचा. या १२ वर्षात तो अनेक विद्यांसोबत नीतिमुल्यांचे संस्कार त्याच्यावर घडवले जायचे. त्यामुळे जेव्हा तो स्वगृही परतायचा तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व सर्व बाजूंनी फुललेलं असायचे. आजकाल मात्र कितीही शिक्षण घेतलं तरी संस्कार कमी पडल्याकारणाने मोठ्या माणसांशी कसं बोलावं, कसं वागाव हे मुलांना समजतच नाही. शालेय परिपाठात दररोज प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखण्याची प्रतिज्ञा करूनसुद्धा आताची मुलं खरंच वडीलधाऱ्यांचा मान राखतात का? याचा अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. याचे कारण मुलांना स्मार्टफोनमुळे नीतिमुल्यांचे संस्कार धूसर झाले आहेत. मूल एका वेगळ्या जगात वावरताना दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या शाळेमध्ये तो जातो त्या त्या शाळेच्या सामाजिक स्तरावर त्याचं वर्तन अवलंबून असताना दिसत आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या मुलाचं वर्तन वेगळं, हायफाय इंग्रजी मीडियम शाळेच्या मुलाचं वर्तन वेगळं, झोपडपट्टीतल्या मुलाचं वर्तन वेगळं तर शाळाबाह्य मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील मुलांचे वर्तन वेगळं, हे असं का घडतं? याचं कारण ते ज्या परिसरामध्ये शिकत असतात त्या परिसरातील मिळणारे अनुभव, होणारे संस्कार त्या मुलाच्या वर्तनावर परिणाम करतात. येणाऱ्या काही काळात देशांमध्ये तरुण पिढी मोठी असणार आहे. या तरुण पिढीवर योग्य संस्कार झाले तर देशाचा विकास होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेची शाळा असो अथवा इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा कुठल्याही माध्यमाची शाळा असो. या शाळेमध्ये मुलांच्यावर नीतिमुल्यांचे संस्कार नियमित करणे गरजेचे आहे. हे करण्याची जबाबदारी आपल्या शिक्षणावर आहे. येथून पुढे शाळेमध्ये मुलांना केवळ अभ्यास शिकून चालणार नाही तर नीतिमुल्यांचे संस्कार करण्यासाठी त्याला नीतिपाठ देणे गरजेचे आहे. अर्थात्, हे नीतिपाठ केवळ पुस्तकी उपयोगाचे नाहीत तर त्याच्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडित आधारित हे नीतिपाठ असले पाहिजेत. एकवेळ गृहपाठ नसला तरी चालेल, शालेय पाठ नसला तरी चालेल; पण नीतिपाठ असायला हवा. नीतिपाठ म्हणजे शाळा सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत मुलाने स्वतःपेक्षा इतरांसाठी काय केलं, इतरांना मदत करत असताना त्याच्या मनात कोणत्या भावना तयार झाल्या, इतरांशी चांगले अथवा वाईट वागत असताना त्याला काय वाटलं? यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये असतील. तो पाठ दररोज घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी करून घेणे महत्वाचे ठरेल. यासाठी वेगळे अभ्यासक्रमाची गरज नाही तर आपल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून हे सहजशक्य होणार आहे. संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज निश्चित ठरणार आहे.

(लेखक प्रयोगशिल शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com