आंबोलीत जमीन वादातून 
तिघांना बेदम मारहाण

आंबोलीत जमीन वादातून तिघांना बेदम मारहाण

आंबोलीत जमीन वादातून
तिघांना बेदम मारहाण

चौघांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः जमिनीत कुंपण घातल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील तिघा सदस्यांना चौघांकडून मारहाण झाली. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आंबोली-बाजारवाडी येथे घडली. याबाबत जखमी दत्ताराम रामचंद्र कर्पे (वय ४०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आंबोली दूरक्षेत्रात चौघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.
कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आपल्यासह आई व वहिनीला शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. कुत्रा अंगावर सोडल्याने त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विनोद विजय जाधव (वय ३९), विजय कृष्णा जाधव (वय ६४), सुधाकर कृष्णा जाधव (वय ५९) व विद्या जाधव या चौघांवर आंबोली दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधक आणि आपल्या जमीन जागेचे वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या शेत घराशेजारी विरोध दगडी कुंपण उभारत होते. यावेळी मी आणि माझे घरातील सदस्य त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो. त्याचवेळी त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सुरू असलेले काम रोखण्यासाठी मी पुढे गेलो असता त्यांनी माझ्यासह परिवारातील सदस्यांना मारहाण केली. कुत्रा आमच्या अंगावर सोडला. यावेळी त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केली. त्यानुसार पोलिसात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com