ग्रामसचिवालय विकासाचे केंद्र

ग्रामसचिवालय विकासाचे केंद्र

swt२०४.jpg
८४०२०
मळगाव : ग्रामसचिवालयाचे उद्घाटन करताना आमदार नीतेश राणे. बाजूला सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

ग्रामसचिवालय विकासाचे केंद्र
नीतेश राणे ः मळगावात नूतन इमारत उद्घाटन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः ग्रामसचिवालय हे गावाच्या विकासाचे केंद्र आहे. गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ ज्या अपेक्षेने ग्रामपंचायतीत येतील, त्यानुसार त्यांची कामे त्वरित पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ग्रामस्थांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून काम करा, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी मळगाव ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती राजू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, नीलेश कुडव, विजयानंद नाईक, तेजपाल सावळ, भाऊ देवळी, अशोक बुगडे, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ गावकर, दादा परब आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, "आमदार, खासदार, मंत्री वा अन्य लोकप्रतिनिधी आपल्याकडे येतात किंवा आपण त्यांच्याकडे जातो, त्यावेळी आपल्या गावाच्या विकासासाठी आवश्यक निधीची मागणी आपण हक्काने करायला हवी. तुम्ही हक्काने मागा, तुम्हाला ते देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर हे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची ग्रामपंचायत या नात्याने गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देऊ नका. ग्रामविकासमंत्री म्हणून गिरीश महाजन चांगले काम करीत आहेत. माझ्या कणकवली मतदारसंघात सध्या २१० कोटींची कामे सुरू आहेत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या लोकप्रतिनिधींकडून हक्काने विकासकामांसाठी निधी मागून घ्या. तुमच्या सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत."
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी ग्रामसचिवालय हे जनसेवेचे केंद्र असून या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लागायला हवा. ग्रामसचिवालयाची इमारत सर्वसामान्य जनतेच्या कामांचे केंद्र ठरायला हवी. ज्या जनतेने आपल्याला निवडून देऊन आपल्या विकासाची जबाबदारी दिली, त्या जनतेचा विकास हाच ध्यास मानून गावाला अभिमानास्पद असे काम करा, असे आवाहन केले. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी ग्रामसचिवालय इमारतीला भेट देत शुभेच्छा दिल्या. ग्रामविकासाच्या कामात पक्षीय हेवेदावे दूर सारून एकत्र येऊन गावाचा विकास करायला हवा. सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसमावेशक निर्णय घेऊन जनतेला अपेक्षित विकास साधा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उद्घाटन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दर्शना बाबर-देसाई यांनीही उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायत स्थापनेपासूनचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व अन्य कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. मळगाव गावातील दशावतार कलाकार, विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त ग्रामस्थांचा तसेच गावविकासात मोलाचा सहभाग देणाऱ्या दिवंगत लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनाही गौरविण्यात आले.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com