तांबी धरणाच्या गेटमधून गळती, चार गावच्या पाणीयोजना धोक्यात

तांबी धरणाच्या गेटमधून गळती, चार गावच्या पाणीयोजना धोक्यात

rat२३३१.txt

बातमी क्र. .३१ ( पान ३ मेन)

फोटो - ratchl२३२.jpg ः
८४८३६

चिपळूण ः रामपूर तांबी धरणातील कमी झालेली पाणीपातळी. (नागेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा)

धरणाच्या गळतीमुळे ४ गावच्या पाणीयोजना धोक्यात

तांबीत गेटला गळती ; ७ हजार लोकांना टंचाईचे चटके

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः चिपळूण-गुहागर मार्गावरील रामपूर तांबी धरणास गळती लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. या धरणावर चार गावच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. धरणाची गळती थांबवण्यास अद्याप पाटबंधारे विभागाला यश आलेले नाही. परिणामी तांबी, रावळगांव, निर्व्हाळ आणि मालघर ग्रामपंचायतीच्या पाणीयोजना अडचणीत आल्या आहेत. चार गावातील सुमारे ६ ते ७ हजार लोकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षात प्रथमच धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. धरणाच्या गेटला गळती लागली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दरवर्षी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने चारही गावातील लोकांना कधी पिण्याच्या पाण्याची चिंता भासली नव्हती; मात्र यावर्षी चार गावातील लोकांना पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धरणाच्या गेट दुरुस्तीबाबत येथील ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे; मात्र धरणातून कमी होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे लोकांची वणवण होऊ नये याची खबरदारीदेखील पाटबंधारे विभागाकडून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाणबुड्यांच्या साह्याने पाहणी करण्यात आली होती तर गेटची काही प्रमाणात दुरुस्ती केली आहे; मात्र तरीही गेटमधून पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत चार गावांतील लोकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तांबी, मालघर, निर्व्हाळ आणि रावळगांवची लोकसंख्या सुमारे सात ते आठ हजाराच्या घरात आहे. फेबुवारीच्या अखेरीलाच उन्हाचे चटके सहन करता येत नसल्याची स्थिती आहे. येत्या काही दिवसात शिमगोत्सवालादेखील सुरवात होणार असल्याने गावात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत गावात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरू आहे. तांबी धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या गेटची दुरुस्ती प्रस्तावित आहे. त्यासाठी निधीदेखील मंजूर झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच गेट दुरुस्ती करण्यावर पाटबंधारे विभागाने भर दिलेला आहे.
..
कोट
तांबी धरणाच्या गेटमधून यापूर्वी गळतीचे प्रमाण जास्त होते. उपाययोजना केल्याने गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. गेटची दुरुस्ती प्रस्तावित आहे. परिसरातील पाणीयोजना अडचणीत येणार नाहीत याचीही खबरदारी घेतली जात आहे.
- विपूल खोत, उपअभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com