ठाकरेंच्या सभेने कोकणातील वातावरण निघाले ढवळून

ठाकरेंच्या सभेने कोकणातील वातावरण निघाले ढवळून

rat०७४०.TXT

बातमी क्र.. ४० ( पान ३ )

ठाकरेंच्या सभेने ढवळले कोकणातील राजकारण

शिमगोत्सवातच राजकीय शिमगा ; मावळ्यांना बळ देणार

सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे ऐन शिमगोत्सवातच कोकणवासीयांना नेत्यांचा राजकीय शिमगा पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन उत्तर रत्नागिरीतील सेनेच्या मावळ्यांना बळ देण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार हे मात्र येणारा काळच ठरवेल.
कोकणातील रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षीच्या फुटीपूर्वी या जिल्ह्यात शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव होता. येथील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिका इत्यादींवर या पक्षाचं वर्चस्व होतं. शिवसेनेने वाड्या-वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. छोट्या छोट्या शिवसेनेच्या शाखामधून सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची स्थानिक पातळीवरील पकड घट्ट केली; पण गेल्या वर्षी जून महिन्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार-खासदारांचा मोठा गट बाहेर पडला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या चार आमदारांपैकी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम हे दोघेजण शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी मंत्री आणि शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात( शिवसेने) सामील झाल्यामुळे कोकणात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पाचही जागांवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेकडे सद्यःस्थितीत गुहागर आणि राजापूर हे दोन मतदारसंघ वगळता अन्य तीनही मतदारसंघात विरोधक ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे या विरोधकांना शह देताना एकाकी पडलेल्या शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून विरोधकांना चितपट करण्यासाठी माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे.
--

कोट १
सभेच्या निमीत्ताने संपूर्ण देशाला समजले की शिवसेना ठाकरेंची आहे. लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असुन, समस्त कोकणवासीय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या सभेचा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आमच्या पक्षाला फायदा होईल.
संदीप कांबळे (तालुकाप्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)
--
कोट २
या सभेचा कोणताही परिणाम शिवसेना पक्षावर होणार नाही. ही सभा इथे सुरु असताना दापोली तालुक्यात पक्षप्रवेश सुरु होते. अगदी काल देखील अनेक गावातील ग्रामस्थांनी ना.रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला आहे. आमदार योगेश कदम यांचा विकासकामांचा धडाका सुरु असुन, या सभेमुळे आम्हाला विशेष फरक पडणार नाही.
कुंदन सातपुते, खेड शहर शिवसेनाअध्यक्ष (शिंदेगट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com