दिवा ते रत्नागिरी पॅसेंजरचे सुधारित वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा ते रत्नागिरी पॅसेंजरचे सुधारित वेळापत्रक
दिवा ते रत्नागिरी पॅसेंजरचे सुधारित वेळापत्रक

दिवा ते रत्नागिरी पॅसेंजरचे सुधारित वेळापत्रक

sakal_logo
By

rat१०३.TXT

बातमी क्र. ३ (टुडे १ साठी)

दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर होणार जलद

दादरहून सोडण्याचा प्रश्न कायम ; नऊ ऐवजी लागणार सहा तास

रत्नागिरी, ता. १० : कोकण रेल्वे मार्गावरील मुंबईतून रत्नागिरीपर्यंत जाणारी दिवा ते रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे १५ मार्चपासून अधिक वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने गाडीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अजूनही पॅसेंजर रेल्वे दादर येथून चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणावासीयांच्या मागणीनुसार ही गाडी दादरपर्यंत नेण्याची सूचना मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
कोकण रेल्वेकडून बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानूसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला ती रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ती गाडी रात्री २ वाजता पोहचत होती. रत्नागिरी येथून सकाळी सुटलेली गाडी दिव्याला दुपारी १.२५ वाजता पोचते. ती परतीच्या फेरीत सायंकाळी ५.५० ला सुटणार आहे. यामध्ये ४ तास २५ मिनिटे गाडी दिवा येथे थांबूनच राहते. एवढ्या वेळात गाडी पूर्वीप्रमाणे दादरला सहज जाऊ शकणार आहे. मात्र यावर अंमलबजावणी कधी होते, याकडे प्रवासी जनतेचे लक्ष लागले आहे. कोरोना पश्चात या गाडीचे काही थांबे वगळण्यात आले आहेत. दिवा ते रत्नागिरी या प्रवासासाठी तब्बल नऊ तास १५ मिनिटे लागत होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे ही गाडी सहा तास ४५ मिनिटात रत्नागिरीत पोचणार आहे. यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजर प्रवास वेळेस तब्बल अडीच तासांची बचत करून फास्ट पॅसेंजरप्रमाणे धावणार आहे.