रत्नागिरी-फणसोप खाडीत गाळाने मच्छीमार त्रस्त

रत्नागिरी-फणसोप खाडीत गाळाने मच्छीमार त्रस्त

फणसोप खाडीतील
गाळाने मच्छीमार त्रस्त
रत्नागिरी, ता. १२ ः खाड्यांच्या मुखाशी असणारा गाळाचा प्रश्न जिल्ह्यात सर्वत्रच जाणवत आहे. रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये खाडीच्या मुखातील गाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून उपसण्याच्या प्रतिक्षेत आहे. आता खाडीतील फणसोप बाजूकडील भागात गाळ सचल्याने हा भागच बुजण्याच्या स्थितीत आला आहे. या भागातून मोठ्या मच्छीमारी नौका या पूर्वी जात असत. आता ओहटीला त्याठिकाणी नौका उभ्याही राहू शकत नसल्याने मच्छीमार त्रस्त झाले आहेत.
रत्नागिरीनजीकच्या भाट्ये येथील खाडीचा बहुतांश भाग गाळाने भरल्याचे ओहोटी काळात दिसून येतो. खाडी परिसर गाळाने भरल्यामुळे आता कालवे, शिंपले तसेच मासेही मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गाळाचे दुष्परिणाम आतापासून दिसू लागले आहेत. भाट्येचा पुढील भाग असलेल्या जुना फणसोप, नवा फणसोप या गावांच्या समोरील भाट्ये खाडीचा भाग गाळाने भरल्याचे दिसून येते. त्यामुळे समुद्राला आलेल्या ओहोटीच्या वेळी गाळ भरल्याचे दिसून येते, फणसोप गावाच्या समोर असलेल्या बेटावर ओहोटीनंतर भरलेल्या गाळावरून पलीकडे चालत जाता येते. त्यामुळे भविष्यात संपूर्ण भाट्ये खाडीच गाळाने भरणार की काय, अशी भीती मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता फणसोप येथील गाळाचा प्रश्नही पुढे आल्याने मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे. फणसोप परिसरातील गाळ लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com