
''महाविकास''कडून जिल्ह्यावर अन्याय
swt134.jpg
88763
कुपवडेः येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना माजी खासदार नीलेश राणे. सोबत दादा साईल, आनंद शिरवलकर, पप्या तवटे आदी. (छायाचित्रः अजय सावंत)
‘महाविकास’कडून जिल्ह्यावर अन्याय
नीलेश राणेः कुपवडे, जांभवडेत विकासकामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला. घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत. ते काम मीच शंभर टक्के पूर्ण करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी घोडगे येथे विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
तालुक्यातील कुपवडे, जांभवडे गावांमध्ये राज्य तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी आला आहे. या विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम माजी खासदार नीलेश राणे व ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, योगेश घाडी, मनोरंजन सावंत, अनंत पाटकर, साई दळवी, अमित तावडे, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, रमेश परब, किरण गावकर, रमाकांत परब, बाबू परब, आबा बोभाटे, श्रीधर सावंत, गोपाळ तेली, विठ्ठल कदम, सागर परब, मनोहर गावकर, गोविंद गावकर, रोहिणी ढवण, काजल गावकर, सुहासिनी गावकर, जांभवडे सरपंच अमित मडव, बाळकृष्ण मडव, अर्चना मडव, विशाल मडव, महादेव मडव, चंद्रकांत मडव, जाबर सावंत, धनंजय सावंत, अर्चना देसाई, संतोष पावसकर, उदय मडव, शुभांगी सावंत, फ्रान्सिस पिंटो आदी उपस्थित होते.
खासदार राणे म्हणाले, ‘‘राज्यात भाजप-शिवसेना सरकार कार्यरत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आली आहे. अडीच वर्षे कार्यरत असणाऱ्या ठाकरे सरकारच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीने जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला. जिल्ह्याला विकासापासून पूर्णपणे वंचित ठेवले. राजकीय हेवेदाव्यांव्यतिरिक्त काहीच केले नाही. गेल्या आठ महिन्यांत शिंदे गट शिवसेना व भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. राज्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कोट्यवधीचा निधी विकासासाठी आलेला आहे. हा विकास आता थांबणार नाही. अजूनही जी कामे प्रलंबित आहेत, ती पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे. खासदार राऊत, आमदार नाईक यांनी केवळ आश्वासनांच्या पलीकडे काही केले नाही. घोडगे-सोनवडे घाटाच्या ज्वलंत प्रश्नाचे घोगडे आजही भिजवत ठेवले आहे. हा प्रश्न ते कधीच मार्गी लावू शकत नाहीत. हा प्रश्न केवळ मीच सोडवू शकतो. आज विकासकामांच्या निमित्ताने मी तुम्हाला शब्द देत असून तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’ यावेळी कुपवडे जांभवडे गावाच्या वतीने राणे यांचे स्वागत करण्यात आले.