
मुल्यांकन
rat१५२९.TXT
नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे गरजेचे असल्याच्या सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसे न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ६० टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन झालेले नाही. राज्यातील नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे अन्यथा मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे त्या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे या आदेशात सांगितले आहे. राज्यातील विनाअनुदानित २१४१ महाविद्यालयांपैकी केवळ १३८ महाविद्यालयांचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन निर्देश दिले आहेत.