रत्नागिरीत पावसाचा शिडकावा

रत्नागिरीत पावसाचा शिडकावा

rat१६३४.TXT

रत्नागिरीत पावसाचा शिडकावा

रत्नागिरी, ता. १६ ः हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. १५) रात्री रत्नागिरीत हलका पाऊस झाला. पावसाला जोर नसल्यामुळे आंबा बागायतदारांनी निःश्‍वास सोडला. पावसामुळे रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता ओला झाल्याने माळनाका येथे दुचाकी चालक घसरुन पडले.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून उष्मा वाढला आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ३९ अंशावर पोचला. त्याचे परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहेत. वाढलेल्या गर्मीमुळे पाऊस पडणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. बुधवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली; मात्र त्यामध्ये जोर नव्हता. रस्ते भिजतील एवढाच पाऊस झाला. पंधरा मिनिटांनी पुन्हा आकाश निरभ्र झाले. पावसाला सुरवात झाल्यानंतर आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले होते. पण पाऊस मोठा नसल्याने त्यांनी निःश्‍वास सोडला. पावसामुळे गुरुवारी दिवसभर हलका वारा वाहत होता. सकाळच्या सत्रात गारवा जाणवत होता. ग्रामीण भागात धुकेही होते. हलक्या पावसाचा आंब्यावर काहीच परिणाम होणार नाही असे आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदा पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन २५ मार्चपर्यंत राहिल. वातावरणातील बदलांमुळे मधल्या टप्प्यात मोहोरच आला नव्हता. पालवी जून होण्यास विलंब झाल्याने फळधारणेची प्रक्रिया लांबली. त्यानंतर त्यामुळे सुमारे महिनाभर आंब्याची आवक कमी राहील. पुन्हा मे महिन्याच्या सुरवातीला आंबा मोठ्याप्रमाणात बाजारात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com