फिरत्या व्यावसायिकांचे अतिक्रमण

फिरत्या व्यावसायिकांचे अतिक्रमण

90228
कणकवली ः शहरातील उड्डाण पुलाखाली आणि महामार्गावरील रस्त्यावर पुन्हा एकदा अतिक्रमण करून व्यावसायिकांनी बस्तान मांडले.


फिरत्या व्यावसायिकांचे अतिक्रमण

कणकवलीत प्रशासनाला ठेंगा; सुटीमुळे कारवाई थांबल्याने मनमानी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० ः महामार्ग प्राधिकरणने पोलिस बंदोबस्तात मागील दोन दिवस अतिक्रमण हटवले. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली भाजी, फळे, फुले, कपडे व अन्य स्टॉल धारकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले; पण, सार्वजनिक सुटीत थांबलेली हटाव मोहीम लक्षात घेऊन व्यावसायिक पुन्हा एकदा रस्त्यावर आणि पुलाखाली फिरते व्यावसाईक ठाण मांडून बसले आहेत.
कणकवली शहरातील महामार्गावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटाव मोहीम दोन दिवस राबवण्यात आली. उड्डाणपुला खालील वेगवेगळे पान स्टॉल, भाजीव्यवसायिकांची बांधकामे व अन्य बांधकामे आणि व्यापाऱ्यांनी मांडलेले बस्तान हटविण्यात आले. या अनधिकृत व्यावसायिकांना नोटीस देऊन पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली होती; पण, शनिवार रविवार असल्याने ही कारवाई थांबवण्यात आली. या दोन्ही दिवशी हळूहळू पुन्हा एकदा अतिक्रमण करणारे व्यावसायिक रस्त्यावर येऊ लागले आहेत. नागरिकांना आपली वाहने थांबवण्यासाठी जागा ही मिळत नाही अशी स्थिती आहे. फळे, फुले, कापडे विक्रेत्यांनी पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. भाजी व्यवसायाबरोबरच कापड व्यवसाय, सुकी मासळी व्यावसायिक व अन्य व्यापाऱ्यांनी येथे पुन्हा एकदा अतिक्रमण केले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा बस्तान मांडण्यात आले. याचा, त्रास नागरिकांना होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा एकदा ही मोहीम राबवून कायमस्वरूपी हटाव मोहीम करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपंचायतीचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मुख्याबाजारातील व्यापाऱ्यांचा रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायिकांना विरोध आहे. लाखोरूपये खर्चकरून उभारलेले व्यवसाय़िक अशा अनधिकृत व्यापारापुळे मेटाकुटीस आले आहेत. हटाव मोहीमेचे त्या व्यापाऱ्यांनी स्वागत केले; पण, कारवाई थांबताच पुन्हा अनधिकृत व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. कणकवली शहरात वाहन थांब्याची सुविधा नाही. त्यामुळे पुलाखाली रस्त्यावर वाहने थांबवावी लागतात; पण, रस्त्यावरच भाजी, फळे, फुले व अन्य दुकाने लावली जात असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
-------
अतिक्रमण होऊ देणार नाही - महेश खटी
राष्ट्रीय महामार्गावर कोणताही अनधिकृत व्यवसाय करता येणार नाहीत. पूर्वीप्रमाणे हटाव मोहीम पुन्हा राबवून अतिक्रमण होऊ देणार नाही अशी माहिती महामार्ग प्राधिकरणची उप अभियंता महेश खटी यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली सुरू असलेल्या अनधिकृत स्टॅाल, व्यवसाय आम्ही हटवला होता. मात्र, पुन्हा एकदा या व्यवसाईकांनी अतिक्रमण केले असेल तर ते हटवले जाईल. कारवाई तर होणार असल्याचे श्री. खटी यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com