रत्नागिरी-जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी-जामीन अर्ज फेटाळला

वारीशे प्रकरणी संशयिताचा
जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी, ता. २८ ः राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणातील पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला.
ही घटना ६ फेब्रवारी २०२३ ला घडली होती. राजापूर-कोदवली येथील पेट्रोलपंपावर गाडीत पेट्रोल भरून निघालेले पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५, रा. कशेळी) यांच्या दुचाकीला एका चार चाकीने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात व नंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. ज्याने धडक दिली त्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांनी खून करण्याच्या उद्देशानेच गाडी अंगावर घालून शशिकांत याला गाडीखाली घालून मारले, असा आरोप करण्यात आला.
सुरवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र वातावरण तापल्यानंतर संशयित आंबेरकर यांच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आंबेरकर यांना अटक केली होती. त्यानंतर आंबेरकरनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मंगळवारी (ता. २८) या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com