चिपळूण-कोयना डावा तीर बंद काम तातडीने सुरू करा

चिपळूण-कोयना डावा तीर बंद काम तातडीने सुरू करा

कोयना डावा तीर कामासाठी सरकार सकारात्मक
---
मंत्री शंभूराज देसाई; शिष्टमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः कोयना प्रकल्प डावा तीर हे काम शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही सध्या बंद आहे. हे काम तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी कोयना प्रकल्प पुनर्विकास संघर्ष समिती अलोरे-कोयनानगरमार्फत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आढावा बैठकीत आपल्या मागणीसंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने देसाई यांच्याशी चर्चा केली. या वेळी हे काम सुरू होण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
कोयना प्रकल्प पुनर्विकास संघर्ष समितीने देसाई यांना कोयनानगर व परिसरातील गावे तसेच अलोरे, कोळकेवाडी, कोंडफणवणे, पोफळी, शिरगाव, नागावे व पेढांवे आदी गावातील सर्व नागरिकांच्यावतीने हे निवेदन दिले. कोयना प्रकल्प डावा तीर हे काम शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही सध्या बंद आहे. हे काम पुन्हा सुरू करावे. या कामासंबंधी सिव्हिल, यांत्रिकी व विद्युत आस्थापना एकाच ठिकाणी कार्यरत आहेत व त्यांच्यामार्फत ती सुरळीत पार पाडणे सोईचे आहे.
कोकण प्रदेशात पावसाळ्यामध्ये मुबलक पाण्याची उपलब्धता, विशिष्ट भौगोलिक रचना, हवामान आणि पाणीटंचाई, कोयना अवजल कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासगटाची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली होती. या अभ्यासगटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्याची उपाययोजना तसेच शेती व औद्योगिक पाण्याचे नियोजनाबाबत उपसासिंचन योजना सुचवण्यात आलेल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने शासनाकडे काही प्रस्तावित प्रकल्प नियोजित करण्यात आले आहेत. यामध्ये स्वयंदेव व नांदिवसे येथे वळण बंधारे बांधण्याचे सूचित केले आहे. या बंधाऱ्याचे पाणी बोगद्याद्वारे कोळकेवाडी धरणात सोडण्याचे नियोजन आहे. कोळकेवाडी धरण अवजल कालव्याद्वारे समुद्रात जाणारे पाणी कोकण विकास महामंडळांर्तगत सध्या प्रस्तावित असलेल्या उपसा सिंचन योजना तसेच अभ्यासगटाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंचन योजना कार्यान्वित करणेचे नियोजन आहे. त्यामुळे प्रस्तावित कामे सुरू व्हावीत. त्यामुळे येथील बंद पडलेले व्यवसाय, बेरोजगारी व ग्रामस्थांना उपजीविका करणे सुलभ होऊन जनजीवन सुरळीत राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश आंब्रे, सचिव सुनीलकुमार सुर्वे, खजिनदार लक्ष्मण पवार व अन्य सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com