कोकण रेल्वेमार्गावर चार समर स्पेशल गाड्या

कोकण रेल्वेमार्गावर चार समर स्पेशल गाड्या

कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी विशेषच्या ७६ फेऱ्या

चाकरमान्यांना दिलासा ; मध्य रेल्वेकडून मंगळवारपासून नियोजन

रत्नागिरी, ता. ३० ः दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने आता उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाण्याचे नियोजन करणाऱ्‍या चारमान्यांसाठी मध्यरेल्वेने चार उन्हाळी विशेष गाड्यांच्या ७६ फेऱ्‍यांचे कोकण रेल्वेमार्गावर नियोजन केले आहे. या गाड्या ४ एप्रिलपासून धावणार आहेत.
पुणे ते सावंतवाडी साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर रविवारी सुटणार आहे. २ एप्रिल ते ४ जून या कालावधीत रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटून सावंतवाडीला दुसऱ्‍या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी येथून बुधवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्याला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एकूण २२ डबे जोडले जाणार आहेत.
समर स्पेशल दुसरी गाडी सावंतवाडी रोड-पनवेल- सावंतवाडी अशी आठवड्यातून एकदा धावेल. ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत दर सोमवारी सुटणार आहे. ती सावंतवाडीतून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला रात्री ती साडेआठ वाजता पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास पनवेल येथून रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल. तिसरी समर स्पेशल पनवेल ते करमाळी मार्गावर आठवड्यातून एकदा धावणार आहे. ती ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत धावणार आहे. पनवेल येथून दर सोमवारी चालवली जाईल. पनवेल येथून ती गाडी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. करमाळी येथून ती दर मंगळवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पनवेलला रात्री साडेआठ वाजता पोहोचेल. चौथी समर स्पेशल गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान आठवड्यातून एकदाच धावणार आहे. ६ एप्रिल ते १ जून या कालावधीत दर मंगळवारी ही गाडी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ही गाडी सायंकाळी ४ वा. सुटेल आणि दुसऱ्‍या दिवशी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी कन्याकुमारीला पोहोचेल. कन्याकुमारी येथून ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी सव्वादोन वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ती रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
-
जादा गाड्यांवर प्रवासासाठी भर द्या
कोकण रेल्वेमार्गावरील नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्यांचा उपयोग चाकरमान्यांनी करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून दरवेळी केले जाते. बहुतांशवेळी कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधासारख्या नियमित धावणाऱ्या गाड्यांना प्रवासी प्राधान्य देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com