रत्नागिरी ः कोकणवासीयांचे महामार्गाचे स्वप्न जानेवारी 2024 पूर्ण

रत्नागिरी ः कोकणवासीयांचे महामार्गाचे स्वप्न जानेवारी 2024 पूर्ण

-rat30p28.jpg, rat30p29.jpg ः
92490
रत्नागिरी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई पाहणी केली. यावेळी टिपलेले छायाचित्र.

-rat३०p२५.jpg
92478
रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत बोलताना नितीन गडकरी. सोबत उदय सामंत, राहुल पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी.

महामार्ग जानेवारीत पूर्ण होणार

नितीन गडकरी ः हवाई पाहणी; दोन टप्पे रखडले

रत्नागिरी, ता. ३० ः देशातील लाख, कोटीचे प्रकल्प मी आतापर्यंत पूर्ण केले; परंतु मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण अजून पूर्ण करू शकलो नाही, याचे दुःख आहे. आज महामार्गाची हवाई पाहणी केली. १० टप्प्यांपैकी ६ आणि ७ या टप्प्यांचेच काम रखडले आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. जानेवारी २०२४ मध्ये कोकणवासीयांचे हे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल आणि अवघ्या साडेचार ते पाच तासांमध्ये मुंबईहून गोव्याला जाता येईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
एमआयडीसी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. गडकरी म्हणाले, ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हा प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही, तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलेल. आज महामार्ग क्र. ६६ची सामंत यांच्यासह पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वनजमिनीच्या मंजुरीस झालेला विलंब यांमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही; परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी केली आहे. या पॅकेजची एकूण सुधारित किंमत १५ हजार ५६६ कोटी आहे. एकूण ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दहा टप्प्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते कांटे (टप्पा ६) आणि कांटे ते वाकेड (टप्पा ७) या दोन टप्प्यांची कामे रखडली आहेत. या कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांनी वेळेत काम न केल्यामुळे त्यांना टर्मिनेट करून नवीन कंपन्यांना काम दिले आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते.
------------
चौकट-
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे!
‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’, अशी मिश्कील टिप्पणी करत श्री. गडकरी म्हणाले, ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ मध्ये अन्य सरकार असताना सुरू झाले; परंतु आता त्यांना दोष देणार नाही. त्यानंतर अनेक ठेकेदार नेमले, अनेक कंपन्यांना टर्मिनेट केले; परंतु आता ‘देर आये दुरुस्त आये’, आता काम पूर्णत्वाकडे नेणे हा एकच उद्देश आहे.’
---------------
चौकट
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चिन्हे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चिन्हांचे फलक (साईन बोर्ड) लावण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले, ‘यामुळे वाहनधारकांना सुलभता होऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com