पर्यटनवाढीसाठी वॉटरप्लेनचा विचार करा

पर्यटनवाढीसाठी वॉटरप्लेनचा विचार करा

rat30p32.jpg
92501
वॉटरप्लेन

‘पर्यटनवाढीसाठी वॉटरप्लेनचा विचार करा’

रत्नागिरी, ता. 30 ः मुंबईत वॉटरप्लेन आणि वॉटरटॅक्सीमुळे चांगले पर्यटन वाढले आहे. हे प्लेन पाण्यात कुठेही उतरवता येते. त्या धर्तीवर रत्नागिरीत वॉटरप्लेन आणि वॉटरटॅक्सी सुरू करण्यासाठी मी उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनवाढीला चांगला फायदा होईल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दळणवळण, उद्योग-व्यवसाय आणि पर्यटनवाढीला मदत होणार आहे. कोकणात पर्यटनाला प्रचंड वाव आहे. मुंबईत नौदलाचे एअरपोर्ट आहे. पाण्यावर उतरणारी विमाने आहेत. पर्यटनवाढीसाठी उत्तम पर्याय आहे. पाण्यामध्ये कुठेही ही विमाने उतरतात. त्यामुळे हवाई आणि जलसफरीच्यादृष्टीने त्याची मागणी वाढेल. त्याला पर्याय म्हणून १८ सीटरवॉटर टॅक्सीदेखील आहेत. अनेक पर्यटक याचा आनंद घेतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
रत्नागिरी जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा आहे. अनेक बंदरे आहेत, कोस्टगार्टचा तळ आहे. त्यामुळे पाण्यावर उतरणाऱ्या या वॉटरप्लेनच्या माध्यमातून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. त्याला छोट्या छोट्या गावांमध्ये जाण्यासाठी वॉटरटॅक्सी ठेवल्यास लोक त्याचा आनंद घेतील. यातून पर्यटन, रोजगारवाढीला मदत होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com