वहाळात ठाण मांडून बसलेला बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहाळात ठाण मांडून बसलेला बिबट्या जेरबंद
वहाळात ठाण मांडून बसलेला बिबट्या जेरबंद

वहाळात ठाण मांडून बसलेला बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

पान १ साठी

९४०७९


वहाळातील बिबट्या
२४ तासांनी पिंजऱ्यात
रेस्‍क्यू ऑपरेशन; वनविभागाचा लागला कस

राजापूर, ता. ६ ः तालुक्यातील गोवळ चौकटवाडी येथील वहाळात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. २४ तासांहून अधिक चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाचा चांगलाच कस लागला होता. अखेर गुरुवारी (ता. ६) सकाळी बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.
गोवळ चौकटवाडी येथील शिमगोत्सवाच्या मांडालगत असलेल्या वहाळात बुधवारी सकाळी बिबट्या बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बराचवेळ बिबट्या जागेवरून हलत नसल्याने ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या अशक्त बनल्याने त्याला पळता येत नव्हते. त्यामुळे त्याला पिंजऱ्यात पकडण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू होता. मात्र, वनविभागाचे अधिकारी जवळ गेल्यानंतर बिबट्या त्यांच्यावर हल्ला करत असल्याने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे जिकिरीचे बनले होते.
बुधवारी सकाळपासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. अखेर गुरुवारी सकाळी बिबट्या वहाळातील मोठ्या दगडांच्या कपारीत जाऊन बसला. त्यानंतर वनविभागाने वहाळात पिंजरा लावून सर्व बाजूंनी मोठी जाळी लावली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. बिबट्याला पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या मोहिमेमध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सूरज तेली, विजय म्हादये, दीपक म्हादये, प्रथमेश म्हादये, दीपक चव्हाण, लांजा वनपाल आरेकर, देवरूख वनपाल तौफीक मुल्ला, माळी, साबणे यांनी मोलीची भूमिका बजावली. गोवळ ग्रामस्थांनीही या मोहीमेमध्ये वनविभागाला सहकार्य केले.


ग्रामस्थांचीही पाचावर धारण
सुमारे चोवीस तासांहून अधिक काळ चाललेल्या मोहिमेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागला. भर वस्तीलगत असलेल्या वहाळात बिबट्या ठाण मांडून बसल्याने ग्रामस्थांचीही पाचावर धारण बसली होती. मात्र, बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला.