ठाकरे शिवसेनेकडून जनतेचा भ्रमनिरास

ठाकरे शिवसेनेकडून जनतेचा भ्रमनिरास

ठाकरे शिवसेनेकडून जनतेचा भ्रमनिरास
विक्रांत पाटील ः आगामी काळात शत प्रतिशत भाजप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः कोकणातील जनतेने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर विश्वास टाकला होता; मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याने आता जनतेच्या अपेक्षा शिंदे-भाजप सरकारकडे वळल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये युतीला शत प्रतिशत यश मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर जनतेत मनातील सरकार सत्तेत आल्याची भावना निर्माण झाली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्यावेळी विरोधक हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढे केवळ विरोधासाठी विरोध करणारे विरोधक जनतेला नको असून २०२४ पर्यंत विरोधक नावालाही उरणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांना भाजप व शिवसेना युतीच्या माध्यमातूनच सामोरी जाणार आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे. अलीकडे झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आगामी पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजप पक्ष पुन्हा एकदा अव्वल असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com