-वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
-वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

-वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

sakal_logo
By

rat१८५.txt

बातमी क्र. ५ (टुडे पान १ साठी)

वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

जिल्हा प्रशासन ; त्रास झाल्यास रुग्णालयाशी संपर्क साधा

रत्नागिरी, ता. १८ : सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताची शक्यता वाढली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्माघात होवू नये म्हणून थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी. उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तत्काळ जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्णतेचा त्रास होणाऱ्‍या रुग्णांसाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्‍या सूचनांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
-
पाच दिवसातील तापमानाच्या नोंदी
१४ एप्रिल- ३५.३ अंश सेल्सिअस
१५ एप्रिल- ३५.८
१६ एप्रिल- ३५.३
१७ एप्रिल- ३५.४
१८ एप्रिल- ३५.५