देवगडात बदलत्या वातावरणाने
बागायतदारांत ''अवकाळी''ची भीती

देवगडात बदलत्या वातावरणाने बागायतदारांत ''अवकाळी''ची भीती

देवगडात लहरी वातावरणाने
अवकाळी पावसाची भीती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः एकीकडे वातावरणातील उष्णता वाढून उकाडा अधिक तीव्र होत असताना आता दुसरीकडे तालुक्याच्या किनारी भागात जोराचा वारा सुटला आहे. कालपासून अधूनमधून जोराचा वारा सुटत आहे. त्यामुळे उष्णता काही प्रमाणात कमी जाणवत आहे; मात्र बदलत्या वातावरणामुळे ही अवकाळी पावसाची चाहूल तर नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवड्यात राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अलीकडे सातत्याने हवामान बदलाचा अनुभव स्थानिक घेत आहेत. केव्हा वातावरण बदलेल, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे येथील आंबा, काजू, कोकम आदी उत्पादने हवामानाच्या लहरीपणामुळे संकटात सापडतात. मध्यंतरी किनारी भागात वातावरणातील उष्णता वाढल्याने उकाड्याची तीव्रता वाढली होती. वातावरणातील उकाडा वाढल्याने आंबा फळे झटपट तयार होत होती. आता किनारी भागात जोराचा वारा सुरू झाला आहे. अधूनमधून वार्‍याचा वेग वाढलेला असतो. यामुळे उकाडा कमी जाणवत असला तरी अवकाळी पावसाची बागायतदारांना भीती आहे. दरम्यान, वारा सुटल्याने मासेमारीही आवश्यक काळजी घेत सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com