जिल्ह्यात आजपासून 11 मे पर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यात आजपासून 11 मे पर्यंत मनाई आदेश लागू

२८ (पान ३ साठी)

जिल्ह्यात आजपासून ११ मे पर्यंत
मनाई आदेश लागू

रत्नागिरी, ता. २७ ः बारसू (ता. राजापूर) येथे सुरू असलेल्या माती परीक्षण प्रक्रियेला होणारा विरोध, १ मे या कामगार दिनाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी होणारी आंदोलने, ५ मे रोजी बौद्ध पौर्णिमा सण या अनुषंगाने किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजपासून ११ मे पर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू, धोपेश्वर, पन्हेळेतर्फे राजापूर, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजुबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या अुनषंगाने २४ एप्रिलपासून माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामास सुरवात करण्यात आले. या कामास प्रकल्पबाधित गावातील काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, ड्रिलिंगच्या कामादरम्यान स्थानिकांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून विविध मागण्यांकरीता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ एप्रिल २०२३ पासून ते ११ मे पर्यंत हा आदेश जारी राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com